शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

Coronavirus : नकारात्मकता, निराशावाद, अफवांना रोखण्याची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 05:27 IST

Coronavirus : ‘‘सरकार ‘कोविड-१९’च्या परिणामांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे याची खात्री नागरिकांना देण्याचीही गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षितता कायम राखण्यासाठी समाजातील एकवाक्यता सुधारणे खूप महत्त्वाचे आहे.’’

नवी दिल्ली : आज देश कोरोना विषाणूचा (कोविड-१९) फैलाव रोखण्यासाठी झटत असताना जनतेतील लढाऊ वृत्ती कायम राखणे अत्यावश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ते म्हणाले,‘‘नकारात्मकता, निराशावाद आणि अफवांना रोखण्याची गरज आहे.’’मोदी यांनी मंगळवारी वृत्तपत्रांच्या वरिष्ठ पत्रकारांशी व्हिडिओ लिंक्सद्वारे संवाद साधला. त्यांनी सांगितले की, ‘‘सरकार ‘कोविड-१९’च्या परिणामांशी लढण्यासाठी कटिबद्ध आहे याची खात्री नागरिकांना देण्याचीही गरज आहे. राष्ट्रीय सुरक्षितता कायम राखण्यासाठी समाजातील एकवाक्यता सुधारणे खूप महत्त्वाचे आहे.’’ सरकार आणि जनता यांच्यात वृत्तपत्रांनी दुवा म्हणून काम करावे आणि राष्ट्रीय आणि प्रांतीय पातळ्यांवर सतत फीडबॅक द्यावा, असे मोदी यांनी संवादात म्हटले.गर्दीपासून दूर राहण्याचे महत्व (सोशल डिस्टन्सिंग) अधोरेखीत करून मोदी यांनी प्रसार माध्यमांना राज्यांनी लॉक डाऊनचे जे निर्णय घेतले त्याचे महत्व व त्याबद्दलची जागरूकता निर्माण करावी, असे म्हटले. याशिवाय विषाणुचा फैलाव झाल्यास काय परिणाम होतात, त्यात आंतरराष्ट्रीय माहिती आणि इतर देशांनी जे प्रयत्न केले त्याची उदाहरणेही द्यावीत, असे म्हटले, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात म्हटले.नकारात्मकता, निराशावाद आणि अफवा यांच्याशी लढणेदेखील महत्वाचे आहे यावर मोदी यांनी भर दिला. मोदी यांनी सहभागी झालेल्यांचे फीडबॅकसाठी आभार मानून जे अधिकारांपासून वंचित आहेत त्यांच्याबद्दलच्या सामाजिक जबाबदारीची आठवणही करूनदिली.देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत माहिती पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रशंसनीय भूमिका पार पाडल्याचा उल्लेख मोदी यांनी केला. प्रसारमाध्यमांचे जाळे (नेटवर्क्स) हे देशव्यापी असून ते शहरे आणि खेड्यांत पोहोचले आहे. यामुळेच या विषाणुच्या आव्हानाशी लढताना व अतिशय सूक्ष्म पातळीवर माहिती पोहोचवण्यात म्हणूनच प्रसारमाध्यमांना आणखी महत्व आले आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

वृत्तपत्रांची विश्वासार्हता प्रचंड आहेमोदी म्हणाले, वृत्तपत्रांची विश्वासार्हता प्रचंड आहे आणि प्रांतांमध्ये स्थानिक पानांना मोठा वाचकवर्ग आहे. म्हणून कोरोना व्हायरसबद्दलची जागरूकता या पानांवर लेख प्रसिद्ध करून निर्माण करणे अत्यावश्यक आहे.या विषाणूची चाचणी करण्याची केंद्रे कुठे कुठे आहेत, कोणी चाचणी करून घेतली पाहिजे, चाचणी करून घेण्यासाठी कोणाशी संपर्क साधला पाहिजे आणि होम आयसोलेशनचे नियम पाळणे का आवश्यक आहे ही माहिती त्याद्वारे देणे आवश्यक आहे.ही माहिती वृत्तपत्रांत आणि त्या वृत्तपत्राच्या वेब पोर्टल्सवर दिली गेली पाहिजे, असे मोदी म्हणाले. लॉकडाऊन असताना जीवनावश्यक वस्तू कोठे उपलब्ध आहेत त्या ठिकाणची माहितीही प्रांतीय पानांवर दिली जाऊ शकते, अशी सूचना त्यांनी केली.१४ ठिकाणांहून जोडले गेले ११ भाषांचे वरिष्ठ पत्रकार- पंतप्रधानांनी अतिशय परिणामकारकतेने देशाशी संवाद साधून व देशाला प्रखर नेतृत्व देऊन बजावलेल्या भूमिकेची पत्रकार आणि वृत्तपत्रांतील अन्य संबंधितांनी प्रशंसा केली. मोदी यांनी प्रेरणादायी व सकारात्मक घटना प्रकाशित करण्याच्या ज्या सूचना केल्या त्यानुसार काम केले जाईल, असेही ते म्हणाले.वृत्तपत्रांची विश्वासार्हता अधिक बळकट केल्याबद्दल मोदी यांचे त्यांनी आभार मानले आणि आजच्या या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा त्यांनी जो संदेश दिला त्याची नोंद घेण्यात आली आहे, असे या निवेदनात म्हटले.संपूर्ण देशातील वृत्तपत्रांचे २० पेक्षा जास्त पत्रकार आणि हितसंबंधींनी नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ लिंक्सद्वारे संवाद साधला. या संवादाशी राष्ट्रीय आणि विभागीय पातळीवरील ११ भाषांचे वरिष्ठ पत्रकार १४ ठिकाणांहून जोडले गेले होते.प्रिंट मीडियाचे महत्व केले अधोरेखितपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असे वाटते की, इलेक्ट्रॉनिक मीडियातील बातम्या जरी लोक पाहत असतील तरी प्रिंट मीडियातील बातम्या वाचल्या जातात. तथापि, लोकांना घाबरविण्याची गरज नाही. काळजी करण्याची मात्र गरज आहे. मोदी यांनी असेही आवाहन केले आहे की, प्रत्येकाने आपले मनोबल उंचाविण्याची गरज आहे.बातम्या लोकांपर्यंत पोहचविणे हे लक्ष्य असले तरी मीडियाचे एक सामाजिक दायित्व आहे. तसेच, प्रिंट मीडियातील वरिष्ठ पत्रकारांशी संवाद साधताना मोदी यांनी प्रिंट मीडियाचे महत्वही अधोरेखित केले आहे. कोरोनाशी कशाप्रकारे सामना करता येईल, यासाठी लोकांची केवळ मानसिकता तयार करणे नव्हे तर, एकजूट करणे हा सरकारचा हेतू आहे. प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये एक दुवा म्हणून मीडिया काम करतो. हा दुवा अधिक प्रभावी बनविण्याचा पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न आहे. लोकांचा वर्तमानपत्रांवर विश्वास आहे आणि या माध्यमातून प्रचार झाला तर फायदा होईल, असे मोदी यांना वाटते. कोरोनाविरुद्ध सरकार जी लढाई लढत आहे त्यात त्यांना प्रिंट मीडियाची साथ हवी आहे. कारण, कोरोनाला रोखण्यासाठी आगामी एक ते दीड महिना अतिशय महत्वाचा आहे.धार्मिक सण- उत्सवासाठी लोकांनी एकत्र येऊन जीव धोक्यात घालू नये, असे सरकारला वाटते. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर लोकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. या काळात गरीब लोकांसाठी सरकार काही उपाययोजना करत आहे. त्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या जात आहेत काय? याचा फिडबॅक प्रिंट मीडियाकडून यावा अशी मोदी यांची अपेक्षा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी