शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

स्वावलंबी भारत होवो! एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 22:54 IST

नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे. आम्हाला कोरोनाआधीच्या जगाला पाहता आले आहे. कोरोना नंतरही जगाला पाहता येणार आहे. दोन्ही कालखंडाकडे पाहिल्यास एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे, असे मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : ४२ लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे सदस्य गमावले आहेत. त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच मोदींनी जीडीपीच्या १० टक्के आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 

नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. एका व्हायरसने जगाला उद्धवस्त केले आहे. करोडो लोक संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असे संकट ना पाहिलेय नाही ऐकले. हे कल्पनेपलिकडचे आहे. आम्हाला कोरोनाआधीच्या जगाला पाहता आले आहे. कोरोना नंतरही जगाला पाहता येणार आहे. दोन्ही कालखंडाकडे पाहिल्यास एकविसावे शतक भारताचे असावे, यासाठी आपली जबाबदारी आहे. यासाठी एकच मार्ग आहे स्वावलंबी भारत. शास्त्रामध्येही हेच सांगितले आहे, असे मोदी म्हणाले.  

जेव्हा कोरोना संकट सुरु झाले तेव्हा भारतात एकही पीपीई किट बनत नव्हती. एन-९५ मास्कचे नाममात्रच उत्पादन होत होते. आज भारतात रोज दोन लाख पीपीई आणि मास्क बनविले जाऊ लागले आहेत. संकटाला संधीमध्ये बदलण्यात आले आहे. हे भारताला ताकदवान बनविण्यास मदत करणार आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

भारत जेव्हा स्वावलंबी होण्याची गोष्ट करतो, तेव्हा त्याची वकीली करत नाही. जी संस्कृती जगाचा विकास करू इच्छिते. जगाला घर मानते. भारताच्या कामाचा प्रभाव जगाच्या कल्याणावर पडतो. टीबी असेल, हागणदारी मुक्ती असेल जगावर त्याचा परिणाम झाला आहे. तणावातून मुक्ती देण्यासाठी भारताकडून जगाला भेट मिळाली आहे. जगाला विश्वास वाटू लागला आहे, भारत काही चांगले करू शकतो. पण प्रश्न आहे कसा? यावर उत्तर आहे १३५ कोटी लोकांनी केलेला स्वावलंबीपणाचा संकल्प यावर उत्तर आहे, असे मोदी म्हणाले. 

जगाला या शतकाच्या सुरुवातीला वायटूकेने ग्रासले होते. तेव्हा भारतीय तंत्रज्ञानेच जगाला वाचविले होते. आम्ही भारतातील तंत्रज्ञान सुधारु, मालवाहतूक सुधारू, दर्जेदार उत्पादने घेऊ. कच्छचा भूकंप पाहिलाय. काही उरले नव्हते, तरीही कच्छ पुन्हा उभे राहिले. भारत स्वावलंबी बनू शकतो. ही इमारत पाच खांबावर उभी राहील. पहिला खांब अर्थव्यवस्था. दुसरा खांब इन्फ्रास्ट्रक्चर, तिसरा खांब आपली व्यवस्था तीही तंत्रज्ञानावर आधारीत, चौथा खांब लोकसंख्याशास्त्र आणि पाचवा खांब मागणी. यावर काम करावे लागणार आहे. या सर्व खांबांना आपण मजबूत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

याचबरोबर मी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करतो. स्वावलंबी भारत मोहिमेसाठी हे पॅकेज काम करेल. गेल्या काळात आर्थिक पॅकेज दिले होते. त्याला आणि आजच्या पॅकजला जोडले तर जवळपास २० लाख कोटी रुपयांचे आहे. भारताच्या जीडीपीच्या जवळपास १० टक्के आहे. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार यावर लक्ष देऊन बनविण्यात आले आहे. यामध्ये कुटीर उद्योग, लघू, मध्यम उद्योग यासाठी आहे. हे पॅकेज देशाच्या श्रमिक, शेतकऱ्यासाठी आहे, असे मोदींनी सांगितले. 

लोकलसाठी व्होकल बना, स्थानिक उत्पादनं खरेदी करा, भारतीय उत्पादनं खरेदी करा. सुधारणा राबवणं हे महत्वाचं, सुधारणा राबवल्यामुळेच संकटात टिकलोय, कुणी विचार केला होता शेतकऱ्यांना थेट पैसे मिळतील, हेही त्यावेळेस झालंय ज्यावेळेस सगळं बंद होतं, सुधारणा आता आणखी वाढवाव्या लागतील, असे मोदी यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी

CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार

चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण

CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था