शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

CoronaVirus News: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २३,६५१, तर ८३२४ रुग्णांना मिळालाय 'डिस्चार्ज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 10:27 IST

देशातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत देशात २३,६५१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे

मुंबई - देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातमधील रुग्णसंख्या अधिक असल्याचे दिसून येते. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले आहे. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये ३ मे नंतरही  लॉकडाऊन कायम राहिल, असे दिसून येत आहेत. सद्यस्थितीत देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २३ हजार ६५१ वर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा ९९५१ वर पोहोचला आहे. देशातील २३,६५१ रुग्णांपैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

देशातील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३० एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत देशात २३,६५१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. तर, या संख्येतील एक रुग्ण स्थलांतरीत आहे. देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १०७४ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गुरुवार ३० एप्रिल सकाळी ०८ वाजेपर्यंतची ही माहिती आहे. याबाबत, महाराष्ट्र परिचय केंद्राने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.    

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश मॉडेलचा विचार करावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारनं राज्यातल्या सर्व जनतेची तपासणी केली. शरीरात शीतज्वराची लक्षणं असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झालेल्या व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. याच मॉडेलचा वापर करण्याची सूचना मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केल्याचं वृत्त 'द इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी