शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?, चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 15:18 IST

मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे, असे पी. चिदंबरम म्हणाले. 

नवी दिल्ली : काँग्रेसने देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. हातात पैसे नसताना गरीब लोक जेवण आणि औषधे कशी खरेदी करु शकतात?, लॉकडाऊनच्या काळात ते जीवन कसे जगतील? असे सवाल करत यांचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच, मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे, असेही पी. चिदंबरम म्हणाले. 

मोदी सरकारवर निशाणा साधत पी. चिदंबरम म्हणाले, "केंद्र सरकारने आवश्यक सुविधांसाठी राज्यांना निधी दिला नाही. तसेच, केंद्र सरकारने प्रत्येक गरीब कुटुंबीयाच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले नाहीत. याबद्दल आम्ही कडक शब्दांत निषेध करतो." याचबरोबर, पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला एक सल्लाही दिला आहे. केंद्र सरकार आपल्या २०२०-२१ च्या ३० लाख कोटीहून अधिक खर्च बजेटमधून ६५,००० कोटी रुपयांपर्यंत सहज काढू शकते. अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारने जास्तकरून उधार घेतले पाहिजे. हा सुद्धा अर्थतज्ज्ञांचा सल्ला चांगला आहे, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले.

दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये सध्या ७ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर ३०८ जणांचा मृत्यू झाला असून ८५७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्ली, मुंबई, इंदूर आणि जयपूर याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु केले आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब या राज्यांसह काही राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याP. Chidambaramपी. चिदंबरम