शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 6,561 नवे रुग्ण, 142 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 11:27 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा आकडा केला आहे. असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 440,648,082 वर पोहोचली आहे. तर 5,993,066 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये देखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा आकडा केला आहे. असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 6,561 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 142 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,29,45,160 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (3 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे सहा हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4,29,45,160 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 77,152 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे  5,14,388 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून मृत्युदरही कमी झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, 14 जिल्ह्यात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून नाट्यगृह आणि सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक गुडन्यूज म्हणजे राज्यात कोरोनामुळे बुधवारी एकही रुग्ण दगावला नसल्याची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची दिवसेंदिवस कमी होताना आकडेवारीतून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू होण्याची सुरूवात झाल्यापासून पुणे शहरात तब्बल वीस महिन्यांनतर तीन अपवाद वगळता प्रथमच कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे वृत्त समोर आले होते. स्वत: महपौर मुरलीधर मोहोळ यांनी यांसदर्भात ट्विट करुन माहिती दिली होती. 

राज्यात बुधवारी  कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात 544 नवीन रुग्णांचे निदान झाले असून रिकव्हरी रेट 98.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा असून एकही मृत्यू झाला नाही. राज्यात 1 एप्रिल 2020 नंतर हा पहिला दिवस आहे, ज्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. म्हणजेच तब्बल 23 महिन्यानंतर हा दिवस पाहायला मिळाला आहे. त्यामुळे, आता कोरोना आटोक्यात आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस