शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 6,561 नवे रुग्ण, 142 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 11:27 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा आकडा केला आहे. असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 440,648,082 वर पोहोचली आहे. तर 5,993,066 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये देखील काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा आकडा केला आहे. असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 6,561 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 142 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 4,29,45,160 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (3 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे सहा हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4,29,45,160 वर पोहोचली. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 77,152 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे  5,14,388 जणांनी आपला जीव गमावला आहे. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून मृत्युदरही कमी झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, 14 जिल्ह्यात निर्बंध आणखी शिथिल करण्यात आले असून नाट्यगृह आणि सिनेमागृह 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आणखी एक गुडन्यूज म्हणजे राज्यात कोरोनामुळे बुधवारी एकही रुग्ण दगावला नसल्याची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित सक्रिय रूग्णांची दिवसेंदिवस कमी होताना आकडेवारीतून दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू होण्याची सुरूवात झाल्यापासून पुणे शहरात तब्बल वीस महिन्यांनतर तीन अपवाद वगळता प्रथमच कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे वृत्त समोर आले होते. स्वत: महपौर मुरलीधर मोहोळ यांनी यांसदर्भात ट्विट करुन माहिती दिली होती. 

राज्यात बुधवारी  कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात 544 नवीन रुग्णांचे निदान झाले असून रिकव्हरी रेट 98.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा असून एकही मृत्यू झाला नाही. राज्यात 1 एप्रिल 2020 नंतर हा पहिला दिवस आहे, ज्यादिवशी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. म्हणजेच तब्बल 23 महिन्यानंतर हा दिवस पाहायला मिळाला आहे. त्यामुळे, आता कोरोना आटोक्यात आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस