शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

CoronaVirus : विदेशातून आलेल्या प्रवाशांवर करडी नजर ठेवा, सर्व राज्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 05:46 IST

CoronaVirus : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निगराणी ठेवणे जरुरी आहे, अशा आंतरराष्टÑीय प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्षात निगराणीत असलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत दिसते, असे गौबा यांनी या पत्रात म्हटले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनआधी विदेशातून भारतात आलेले एकूण प्रवासी आणि कोविड-१९ संसर्गामुळे प्रत्यक्षात निगराणीत ठेवण्यात आलेल्या प्रवाशांत तफावत दिसते. यामुळे कोविड-१९ रोगाचा प्रसार रोखण्यासाठीचे प्रयत्न धोक्यात येऊ शकतात. कारण भारतात कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींचा इतिहास आंतरराष्ट्रीय प्रवासाचा आहे; तेव्हा विदेशातून भारतात आलेल्या सर्व प्रवाशांवर निगराणी ठेवण्यात यावी, असे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून निगराणी ठेवणे जरुरी आहे, अशा आंतरराष्टÑीय प्रवाशांची संख्या आणि प्रत्यक्षात निगराणीत असलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत दिसते, असे गौबा यांनी या पत्रात म्हटले आहे.कोरोना साथीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांत भारतात आलेल्या सर्व आंतरराष्टÑीय प्रवाशांवर लक्ष ठेवणे सुरू केले. कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवणे महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानेही ही निगराणी अत्यंत महत्त्वाची असल्याने सातत्याने निक्षून सांगितले आहे. तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलण्यास सांगितले आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार अशा प्रवाशांवर तात्काळ निगराणीखाली ठेवण्यावर लक्ष केंद्रित करून तातडीने ठोस कृती करावी.- २३ मार्च २०२० पर्यंत विदेशातून भारतात १५ लाख प्रवासी आले. भारताने १८ जानेवारी २०२० पासून विमानतळावर आंतरराष्टÑीय प्रवाशांची तपासणी करणे सुरू केले. निगराणीखाली असलेल्या या १५ लाखांहून अधिक प्रवाशांचा तपशील स्थलांतर विभागाने सामायिक केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या