शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Coronavirus: जिंकलंस भावा... गरिब अन् मजूरांची भूक भागवण्याठी दोन भावंडांनी चक्क जमीनच विकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:46 IST

लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही.

ठळक मुद्देकर्नाटकमध्ये दोन भावांनी चक्क आपली जमीन विकून गरिबांना मदत केलीय. 

बंगळुरू - कोरोनाच्या संकटामुळे पैशासाठी आणि पैशामागे धावणारा माणूस आज घरात बसून आहे. कोट्याधीश, अब्जाधीश असतानाही या महामारीचा सामना त्याला घरातच बसून करावा लागत आहे. घरात धान्य नसलेल्या गरिबांनाही अन् अब्जाधीश असलेल्या उद्योजकांनाही कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही. केवळ घरात राहणे आणि कोरोनाला दूर पळवणे हाच सर्वसाधारण इलाज या महारोगावर आहे. त्यामुळे, सर्वचजण आपल्या गावी, अन् घरात बसून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत आहेत. मात्र, गरिब आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. कित्येकांना दैनंदिन अन्नासाठी हात पसरावे लागत असून त्यांची उपासमार होत आहे. त्यातच, या संकटाने माणसाला माणूसपण चागंलच शिकवलंय. या गरजूंच्या मदतीसाठी कित्येक हात पुढे आले आहेत. कर्नाटकमध्ये दोन भावांनी चक्क आपली जमीन विकून गरिबांना मदत केलीय. 

लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे, गरिब, मजूर आणि हाताव पोट असलेल्या नागरिकांमध्ये भीती अन् काळजीचं वातावरण आहे. हाताला काम नाही, घरात धान्य नाही मग खायचं काय अन् जगायचं कसं? हा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर आ वासून उभा आहे. मात्र, सजाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटना पुढे येत असून अन्नदानाचे काम करत आहेत. गरिबांच्या घरी धान्य पोहोचविण्याचं काम सुरुय. कर्नाटकमधील दोन शेतकरी भावांनी चक्क आपली जमीनच विकली आहे. शहरात घेतलेला प्लॉट विकून गरिबांना मदतीचा हात या भावांनी दिला आहे. 

कर्नाटकच्या कोलार शहरात तजामुल आणि मुजम्मिल पाशा या दोन भावांनी गरीबांना धान्य देण्यासाठी, त्यांच पोट भरण्यासाठी स्वत:च्या मालकिची जमीनच विकली आहे. भावा भावांनी जमीन विकून 25 लाख रुपये उभा केले. त्यानंतर एका नेटवर्कच्या मदतीने धान्य आणि भाज्या एकत्र केल्या. त्यानंतर धान्याची पाकिटं तयार केली. ज्यामध्ये दहा किलो तांदूळ, एक किलो आटा, 2 किलो गहू, 1 किलो साखर, तेल, चहापूड, सॅनिटायझर आणि मास्क अशा स्वरुपाचं किराणा कीट पुरविण्यात आलं. हे साहित्य वाटपासाठी त्यांनी घराजवळच एक तंबू उभारला आहे. तर, शेजारीत एक कम्युनिटी किचन सुरु केलंय. या किचनच्या माध्यमातून ज्यांना घरी अन्न शिजवणं शक्य नाही, अशांना पोटभर जेवण देण्यात येत आहे. आत्तापर्यंत २८०० कुटुंबातील १२ हजार लोकांनी यांनी मदत केली आहे. 

हे दोन भावंड लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यावेळी, आजीसोबत ते कोलार येथे आले, आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शिक्षणही घेता आले नाही. लहानपणी एका मुस्लीम व्यक्तीने मशिदीजवळ घर दिले, सर्वच धर्मीयांनी आम्हाला मदत केली. कुणीही आमची जात वा धर्म पाहिला नाही, त्यावेळी आम्हाला भाकरीची किंमत कळाली होती, म्हणून आम्हीही माणसूकी जपत आपल कर्तव्य बजावत असल्याचं तजामुलने म्हटले. या दोन भावांच्या दर्यादीलपणाची चर्चा सध्या कोलार शहरात आणि बंगळोरमध्ये होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगारfoodअन्नBengaluruबेंगळूर