शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Coronavirus: जिंकलंस भावा... गरिब अन् मजूरांची भूक भागवण्याठी दोन भावंडांनी चक्क जमीनच विकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:46 IST

लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही.

ठळक मुद्देकर्नाटकमध्ये दोन भावांनी चक्क आपली जमीन विकून गरिबांना मदत केलीय. 

बंगळुरू - कोरोनाच्या संकटामुळे पैशासाठी आणि पैशामागे धावणारा माणूस आज घरात बसून आहे. कोट्याधीश, अब्जाधीश असतानाही या महामारीचा सामना त्याला घरातच बसून करावा लागत आहे. घरात धान्य नसलेल्या गरिबांनाही अन् अब्जाधीश असलेल्या उद्योजकांनाही कोरोनामुळे घराबाहेर पडता येत नाही. केवळ घरात राहणे आणि कोरोनाला दूर पळवणे हाच सर्वसाधारण इलाज या महारोगावर आहे. त्यामुळे, सर्वचजण आपल्या गावी, अन् घरात बसून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत आहेत. मात्र, गरिब आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. कित्येकांना दैनंदिन अन्नासाठी हात पसरावे लागत असून त्यांची उपासमार होत आहे. त्यातच, या संकटाने माणसाला माणूसपण चागंलच शिकवलंय. या गरजूंच्या मदतीसाठी कित्येक हात पुढे आले आहेत. कर्नाटकमध्ये दोन भावांनी चक्क आपली जमीन विकून गरिबांना मदत केलीय. 

लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे, गरिब, मजूर आणि हाताव पोट असलेल्या नागरिकांमध्ये भीती अन् काळजीचं वातावरण आहे. हाताला काम नाही, घरात धान्य नाही मग खायचं काय अन् जगायचं कसं? हा मोठा प्रश्न या नागरिकांसमोर आ वासून उभा आहे. मात्र, सजाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि संघटना पुढे येत असून अन्नदानाचे काम करत आहेत. गरिबांच्या घरी धान्य पोहोचविण्याचं काम सुरुय. कर्नाटकमधील दोन शेतकरी भावांनी चक्क आपली जमीनच विकली आहे. शहरात घेतलेला प्लॉट विकून गरिबांना मदतीचा हात या भावांनी दिला आहे. 

कर्नाटकच्या कोलार शहरात तजामुल आणि मुजम्मिल पाशा या दोन भावांनी गरीबांना धान्य देण्यासाठी, त्यांच पोट भरण्यासाठी स्वत:च्या मालकिची जमीनच विकली आहे. भावा भावांनी जमीन विकून 25 लाख रुपये उभा केले. त्यानंतर एका नेटवर्कच्या मदतीने धान्य आणि भाज्या एकत्र केल्या. त्यानंतर धान्याची पाकिटं तयार केली. ज्यामध्ये दहा किलो तांदूळ, एक किलो आटा, 2 किलो गहू, 1 किलो साखर, तेल, चहापूड, सॅनिटायझर आणि मास्क अशा स्वरुपाचं किराणा कीट पुरविण्यात आलं. हे साहित्य वाटपासाठी त्यांनी घराजवळच एक तंबू उभारला आहे. तर, शेजारीत एक कम्युनिटी किचन सुरु केलंय. या किचनच्या माध्यमातून ज्यांना घरी अन्न शिजवणं शक्य नाही, अशांना पोटभर जेवण देण्यात येत आहे. आत्तापर्यंत २८०० कुटुंबातील १२ हजार लोकांनी यांनी मदत केली आहे. 

हे दोन भावंड लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यावेळी, आजीसोबत ते कोलार येथे आले, आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शिक्षणही घेता आले नाही. लहानपणी एका मुस्लीम व्यक्तीने मशिदीजवळ घर दिले, सर्वच धर्मीयांनी आम्हाला मदत केली. कुणीही आमची जात वा धर्म पाहिला नाही, त्यावेळी आम्हाला भाकरीची किंमत कळाली होती, म्हणून आम्हीही माणसूकी जपत आपल कर्तव्य बजावत असल्याचं तजामुलने म्हटले. या दोन भावांच्या दर्यादीलपणाची चर्चा सध्या कोलार शहरात आणि बंगळोरमध्ये होत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगारfoodअन्नBengaluruबेंगळूर