शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 08:59 IST

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देभारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली आहे.जीव धोक्यात घालून डॉक्टर्स करतायेत कोरोनाग्रस्तांवर उपचार

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशात नवं संकट उभं राहिलं आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटली, अमेरिकासारख्या देशांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जगात ३ लाख ७८ हजार नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत तर १६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारने लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली आहे. कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहे. देशात सध्या कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झालं आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. पण डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कामगार यांचे काय? लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत. अनेक स्तरातून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. ओडिशातील एका डॉक्टरच्या आईचं निधन झाल्यानंतरही कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉक्टर रुग्णालयात पोहचले. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार १७ मार्च रोजी संबलपूर येथील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या ८० वर्षीय आईचं निधन झालं. या कठीण प्रसंगातही डॉ. अशोक दास ड्युटीवर पोहचले. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडली.

दिवसभर डॉ. अशोक यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली. कोरोनापासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या. जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. संध्याकाळी कामावरुन परतल्यानंतर त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले. अशा संघर्षाच्या परिस्थितीत सुट्टी न घेता डॉक्टर अशोक दास यांनी कर्तव्य पार पाडलं. त्यामुळे डॉक्टर अशोक दास यांच्या ध्येर्याला अनेकजण सलाम करत आहेत.  

त्यामुळे लोकांनीही केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आपली आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी स्वत:च्या हाती आहे. डॉ. अशोक दास यांच्यासारखांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तरच कोरोनापासून भारताला वाचवण्यात यश येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर