शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 08:59 IST

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देभारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली आहे.जीव धोक्यात घालून डॉक्टर्स करतायेत कोरोनाग्रस्तांवर उपचार

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशात नवं संकट उभं राहिलं आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटली, अमेरिकासारख्या देशांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जगात ३ लाख ७८ हजार नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत तर १६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारने लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली आहे. कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहे. देशात सध्या कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झालं आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. पण डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कामगार यांचे काय? लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत. अनेक स्तरातून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. ओडिशातील एका डॉक्टरच्या आईचं निधन झाल्यानंतरही कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉक्टर रुग्णालयात पोहचले. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार १७ मार्च रोजी संबलपूर येथील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या ८० वर्षीय आईचं निधन झालं. या कठीण प्रसंगातही डॉ. अशोक दास ड्युटीवर पोहचले. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडली.

दिवसभर डॉ. अशोक यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली. कोरोनापासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या. जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. संध्याकाळी कामावरुन परतल्यानंतर त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले. अशा संघर्षाच्या परिस्थितीत सुट्टी न घेता डॉक्टर अशोक दास यांनी कर्तव्य पार पाडलं. त्यामुळे डॉक्टर अशोक दास यांच्या ध्येर्याला अनेकजण सलाम करत आहेत.  

त्यामुळे लोकांनीही केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आपली आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी स्वत:च्या हाती आहे. डॉ. अशोक दास यांच्यासारखांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तरच कोरोनापासून भारताला वाचवण्यात यश येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर