शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलला पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 08:59 IST

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देभारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली आहे.जीव धोक्यात घालून डॉक्टर्स करतायेत कोरोनाग्रस्तांवर उपचार

नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे देशात नवं संकट उभं राहिलं आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटली, अमेरिकासारख्या देशांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जगात ३ लाख ७८ हजार नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत तर १६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोना रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत पोहचला आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारने लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवली आहे. कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर्स जीव धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहे. देशात सध्या कोरोनामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे सर्व जनजीवन ठप्प झालं आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. पण डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कामगार यांचे काय? लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत. अनेक स्तरातून या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. ओडिशातील एका डॉक्टरच्या आईचं निधन झाल्यानंतरही कर्तव्य पार पाडण्यासाठी डॉक्टर रुग्णालयात पोहचले. इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार १७ मार्च रोजी संबलपूर येथील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या ८० वर्षीय आईचं निधन झालं. या कठीण प्रसंगातही डॉ. अशोक दास ड्युटीवर पोहचले. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी पार पाडली.

दिवसभर डॉ. अशोक यांनी अनेक बैठकांना हजेरी लावली. कोरोनापासून वाचण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या. जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयाला भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेतला. संध्याकाळी कामावरुन परतल्यानंतर त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले. अशा संघर्षाच्या परिस्थितीत सुट्टी न घेता डॉक्टर अशोक दास यांनी कर्तव्य पार पाडलं. त्यामुळे डॉक्टर अशोक दास यांच्या ध्येर्याला अनेकजण सलाम करत आहेत.  

त्यामुळे लोकांनीही केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करुन जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, आपली आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी स्वत:च्या हाती आहे. डॉ. अशोक दास यांच्यासारखांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावा तरच कोरोनापासून भारताला वाचवण्यात यश येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर