शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

CoronaVirus News: देशात रुग्णसंख्या ६५ लाखांवर; ५५ लाख लोेक बरे झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 01:23 IST

CoronaVirus News: बळींचा आकडा लाखावर; बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८४ टक्के

नवी दिल्ली : देशामध्ये रविवारी कोरोनाचे ७५,८२९ नवे रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ६५ लाखांवर पोहोचली आहे. या संसर्गातून आतापर्यंत ५५ लाख जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आणखी ९४० जण मरण पावले असून बळींची एकूण संख्या १,०१,७८२ झाली आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या ६५,४९,३७३ आहे तर या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ५५,०९,९६६ वर पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८४.१३ टक्के आहे.देशात सध्या ९,३७,६२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १४.३२ टक्के इतके आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५५ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ९,७१८, कर्नाटकमध्ये ९,२१९, उत्तर प्रदेशात ५,९७७, आंध्र प्रदेशमध्ये ५,९४१, दिल्लीमध्ये ५,४७२, पश्चिम बंगालमध्ये ५,१३२, पंजाबमध्ये ३,५६२, गुजरातमध्ये ३,४८७ इतकी आहे.कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ७६ लाख आहे. या क्रमवारीत दुसºया स्थानावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांनी कमी आहे. तर क्रमवारीत तिसºया स्थानी असलेल्या ब्राझीलमध्ये ४९ लाख कोरोना रुग्ण आहेत. भारतामधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आॅक्टोबर महिन्यात अमेरिकेपेक्षा अधिक होणार, असे भाकीत काही संशोधकांनी संख्याशास्त्राचा आधार घेऊन वर्तविले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येकडे साºया जगाचेही लक्ष लागले आहे.7.89 कोटी चाचण्याआयसीएमआरच्या माहितीनुसार ३ आॅक्टोबर रोजी देशात 11,42,131 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे चाचण्यांची एकूण संख्या झाली आहे7,89,92,534.गोव्यात कोरोना मृत्यूदर राष्ट्रीय प्रमाणानजीकआजच्या तारखेला राष्ट्रीय स्तरावरील प्रमाण हे निम्म्यापेक्षा अधिक घटून 1.8 टक्क्यावर आले आहे. गोव्यात दोन महिन्यांपूर्वी कोविड मृत्यूचे प्रमाण हे०.6 टक्के म्हणजे अर्ध्या टक्क्याच्या आसपास होते. आता ते दुप्पट होऊन १.३ टक्क्यावर पोहोचले आहे. हे असेच चालू राहिले तर गोव्यात कोविड मृत्यूचे प्रमाण हे राष्ट्रीय प्रमाणाशी केवळ बरोबरी साधणार असे नाही, तर त्यापेक्षाही अधिक वर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण २४ तासांत १२ जणांचे मृत्यू होण्याचे प्रकार सलग दोन वेळा घडले आहेत.राष्ट्रीय स्तरावर कोविडमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे दोन महिन्यांपूर्वी ५ टक्के इतके प्रचंड होते, तर गोव्यात ते अर्ध्या टक्क्याहून कमी होते.तीन महिन्यांपूर्वी २४ तासांत दोन किंवा ३ मृत्यू होण्याचे प्रमाण होते. हे प्रमाण ८ ते ९ बळींवर पोहोचल्यानंतर कोविड इस्पितळाचा ताबा हॉस्पिसियो इस्पितळाकडून काढून घेऊन तो गोवा मेडिकल कॉलेजकडे (गोमेकॉ) सोपविला होता. मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा मुख्य उद्देश ठेवून हा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आला होता. ताबा गोमेकॉकडे गेल्यावर कोविड बळींचे प्रमाण कमी तर झाले नाहीच, उलट ते वाढून १२ बळींवर पोहोचले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या