शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रुग्णसंख्येत वाढ, लहान मुलांना धोकादायक; कोरोनाची चौथी लाट आली?, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:30 IST

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आलेला कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र समोर आले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी दिल्लीत ५१७ कोरोना रुग्ण आढळले. तर संक्रमणाचा दर ४.२१ टक्क्यावर पोहचला आहे. ज्या वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप कोरोना लाटेबाबत ठोस सांगू शकत नाही असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, सध्या घाबरण्याची गरज नाही. कारण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्लीत ७७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. तीच संख्या रविवारी वाढून ९६४ इतकी झाली आहे. १ एप्रिलला होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या ३३२ इतकी होती. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते. शनिवारी पॉझिटिव्हीटी रेट ५.३३ टक्के होता तर रुग्णसंख्या ४६१ झाली होती. तर रविवारी संक्रमण दरात घट झाली परंतु नवीन संक्रमित रुग्णांमध्ये ५० हून अधिक वाढ झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचण्या इतक्या जास्त प्रमाणात होत नाही. रविवारी १२ हजार २७० कोविड चाचणी झाली. शनिवारी ८ हजार ६४६ चाचणी करण्यात आली. इतक्या कमी चाचणीत संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपर्यंत पोहचणे चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक आहे.

लहान मुलांना धोका वाढला

दिल्ली आणि लगतच्या एनसीआर भागातील अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत. शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळल्यावर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्येही अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही, मागील लाटेंमधील आकडेवारी पाहता असे दिसून येते की जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे असतात आणि त्यांच्यावर लवकर उपचार केले जातात.

रुग्ण वाढण्याचं कारण काय?

ओमायक्रॉनमुळे आलेली तिसरी लाट जवळजवळ थांबली होती, परंतु आता पुन्हा एकदा संक्रमित लोकांची संख्या वाढू लागली आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसली तरी होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण याचे कारण काय? त्यावर तज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेनंतर संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचे सांगितले आहे. दिल्लीतही मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. लोकांचा बेफिकीरपणाही वाढला होता. या सर्व कारणांमुळे संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या