शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

Coronavirus: रुग्णसंख्येत वाढ, लहान मुलांना धोकादायक; कोरोनाची चौथी लाट आली?, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:30 IST

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आलेला कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र समोर आले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी दिल्लीत ५१७ कोरोना रुग्ण आढळले. तर संक्रमणाचा दर ४.२१ टक्क्यावर पोहचला आहे. ज्या वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप कोरोना लाटेबाबत ठोस सांगू शकत नाही असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, सध्या घाबरण्याची गरज नाही. कारण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्लीत ७७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. तीच संख्या रविवारी वाढून ९६४ इतकी झाली आहे. १ एप्रिलला होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या ३३२ इतकी होती. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते. शनिवारी पॉझिटिव्हीटी रेट ५.३३ टक्के होता तर रुग्णसंख्या ४६१ झाली होती. तर रविवारी संक्रमण दरात घट झाली परंतु नवीन संक्रमित रुग्णांमध्ये ५० हून अधिक वाढ झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचण्या इतक्या जास्त प्रमाणात होत नाही. रविवारी १२ हजार २७० कोविड चाचणी झाली. शनिवारी ८ हजार ६४६ चाचणी करण्यात आली. इतक्या कमी चाचणीत संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपर्यंत पोहचणे चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक आहे.

लहान मुलांना धोका वाढला

दिल्ली आणि लगतच्या एनसीआर भागातील अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत. शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळल्यावर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्येही अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही, मागील लाटेंमधील आकडेवारी पाहता असे दिसून येते की जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे असतात आणि त्यांच्यावर लवकर उपचार केले जातात.

रुग्ण वाढण्याचं कारण काय?

ओमायक्रॉनमुळे आलेली तिसरी लाट जवळजवळ थांबली होती, परंतु आता पुन्हा एकदा संक्रमित लोकांची संख्या वाढू लागली आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसली तरी होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण याचे कारण काय? त्यावर तज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेनंतर संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचे सांगितले आहे. दिल्लीतही मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. लोकांचा बेफिकीरपणाही वाढला होता. या सर्व कारणांमुळे संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या