शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

Coronavirus: रुग्णसंख्येत वाढ, लहान मुलांना धोकादायक; कोरोनाची चौथी लाट आली?, तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 15:30 IST

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते.

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आलेला कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं चित्र समोर आले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. रविवारी दिल्लीत ५१७ कोरोना रुग्ण आढळले. तर संक्रमणाचा दर ४.२१ टक्क्यावर पोहचला आहे. ज्या वेगाने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतेय त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप कोरोना लाटेबाबत ठोस सांगू शकत नाही असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, सध्या घाबरण्याची गरज नाही. कारण हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचं प्रमाण कमी आहे. परंतु होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या वेगाने वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी दिल्लीत ७७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. तीच संख्या रविवारी वाढून ९६४ इतकी झाली आहे. १ एप्रिलला होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या संक्रमितांची संख्या ३३२ इतकी होती. दिल्लीत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.

गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे ३२५ रुग्ण समोर आले होते. तर पॉझिटिव्हीटी रेट २.३९ इतका होता. शुक्रवारी ३.९५ पॉझिटिव्हीटी रेटसह ३६६ रुग्ण आढळले होते. शनिवारी पॉझिटिव्हीटी रेट ५.३३ टक्के होता तर रुग्णसंख्या ४६१ झाली होती. तर रविवारी संक्रमण दरात घट झाली परंतु नवीन संक्रमित रुग्णांमध्ये ५० हून अधिक वाढ झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचण्या इतक्या जास्त प्रमाणात होत नाही. रविवारी १२ हजार २७० कोविड चाचणी झाली. शनिवारी ८ हजार ६४६ चाचणी करण्यात आली. इतक्या कमी चाचणीत संक्रमणाचा दर ५ टक्क्यांपर्यंत पोहचणे चिंतेची बाब आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार ५ टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट चिंताजनक आहे.

लहान मुलांना धोका वाढला

दिल्ली आणि लगतच्या एनसीआर भागातील अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याची प्रकरणेही समोर येऊ लागली आहेत. शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळल्यावर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्येही अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही, मागील लाटेंमधील आकडेवारी पाहता असे दिसून येते की जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे असतात आणि त्यांच्यावर लवकर उपचार केले जातात.

रुग्ण वाढण्याचं कारण काय?

ओमायक्रॉनमुळे आलेली तिसरी लाट जवळजवळ थांबली होती, परंतु आता पुन्हा एकदा संक्रमित लोकांची संख्या वाढू लागली आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसली तरी होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण याचे कारण काय? त्यावर तज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेनंतर संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचे सांगितले आहे. दिल्लीतही मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. लोकांचा बेफिकीरपणाही वाढला होता. या सर्व कारणांमुळे संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या