शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Coronavirus: “२०-२५ रात्री मी झोपलो नाही, ‘त्या’ रुग्णाचा चेहरा कधीच विसरणार नाही”; वाचा डॉक्टरचा थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 12:13 IST

Coronavirus: कोणी म्हणायचं माझा मुलगा आहे, कोणी माझे वडील आहेत प्लीज त्यांना कसंही करून वाचवा. आम्ही दिवसरात्रं आयसीयूमध्ये कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो.

ठळक मुद्देमाझी पत्नी जी अपोलो हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ होती. तीदेखील पॉझिटिव्ह आली. निराश आणि हताश झालेले लोक औषधांसाठी बेडसाठी संघर्ष करताना दिसून आले. भलेही कोरोनाचा धोका आत्ता आपल्याला कमी वाटत असला, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी निष्काळजीपणा कधीच करू नका.

नवी दिल्ली – डॉ. युद्धवीर सिंह एम्सच्या एनेस्थिसीया आणि क्रिटिकल केअरमध्ये असिस्टेंट प्रोफेसर आहेत. एम्समधील कोविड आयसीयूत मोठी जबाबदारी सांभाळून त्यांना एक वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. या महामारीच्या काळात त्यांना खूप काही बघावं लागलं. परंतु जे दुसऱ्या लाटेत पाहावं लागलं ते कधीच विसरू शकत नाही

डॉ. युद्धवीर सांगतात की, मार्च अखेर आणि एप्रिल २०२१ खूप त्रासदायक आणि तणावग्रस्त होता. रुग्णांची संख्या इतकी होती की त्यांचा सांभाळणं कठीण झालं. आजही मला ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. एप्रिलमध्ये माझे दोन्ही मोबाईल सातत्याने खणखणत होते. त्या भयानक काळात २०-२५ रात्री झोपही लागली नाही. प्रत्येकवेळी कॉल सुरूच होता. कोणाकडे ऑक्सिजन नाही, कोणी घरी उपचार कसे करायचे अशी विचारणा करत राहायचे. सल्ले दिले तर चिंता लागलेली असायची. इतकं हताश होतो की, हॉस्पिटलमध्ये कामाला असूनही कोणाला बेडदेखील देऊ शकत नव्हतो.

कोणी म्हणायचं माझा मुलगा आहे, कोणी माझे वडील आहेत प्लीज त्यांना कसंही करून वाचवा. आम्ही दिवसरात्रं आयसीयूमध्ये कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. अनेकदा संतप्त नातेवाईकांनी शिव्याही दिल्या. अशा संकटकाळी तेदेखील तणावात होते हे आम्हाला जाणवत होते. आम्ही पीपीई किट्समध्ये असायचो, कोणाशी संपर्क नाही. अनेक रुग्ण दगावत असल्याचं पाहून आम्हीदेखील कोलमडून पडायचो. एक युवक रुग्ण आठवतो तो नेहमी बोलत होता. आय विल फाइट बॅक सर, मी क्रिकेट खेळतो, रनिंगही केलं आहे. मला काही होणार नाही. अखेर आम्ही त्याला वाचवू शकलो नाही हा विचार करून मन दु:खी होतं.

त्याचवेळी माझी पत्नी जी अपोलो हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ होती. तीदेखील पॉझिटिव्ह आली. हा पीक टाइम होता. मला स्वत:ला लाज वाटत होती की पत्नी पॉझिटिव्ह आली असतानाही मी तिची साथ देऊ शकत नव्हतो. परंतु ती स्वत: एक डॉक्टर आहे तिने मला हिंमत दिली. प्रत्येक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचे मेसेज, कॉल्स पाहायला मिळत होते. सोशल मीडियातही लोक दुबईपर्यंत मदत मागत होते.

त्या दिवशी हताश झालो

एप्रिलमध्ये माझा एक मित्र एम्समध्ये डॉक्टर होता. त्याचा सख्खा भाऊ जो डॉक्टर आहे त्याला मदत हवी होती. परंतु आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. स्वत:च्या नातेवाईकांनाही जागा नसल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकत नव्हतो. जर बेड मिळाला नाही तर मी जीव देईन असं मित्र म्हणाला. निराश आणि हताश झालेले लोक औषधांसाठी बेडसाठी संघर्ष करताना दिसून आले. ऑक्सिजन, बेड्ससाठी कॉल यायचे. मला असं वाटायचं की आम्हाला ऑक्सिजनची गरज भासली तेव्हा मिळेल का? बेड मिळेल का? अखेर हे वादळ कधी संपणार असं मला सारखं वाटत होतं असं डॉक्टर युद्धवीर सिंह म्हणाले.

त्या रुग्णाचा चेहरा कधीच विसरू शकत नाही

डॉ. युद्धवीर यांनी एका रुग्णाबद्दल सांगितले की, तो एक फायटर रुग्ण होता. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु जेव्हा त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली त्यानंतर अचानक २५ दिवसांनी त्याची तब्येत ढासळली आणि तो गेला यावर मला विश्वास बसत नव्हता. त्याच्या बहिणीला सांगणंही मला कठीण झालं. जेव्हा एखादा रुग्ण बरा होत असतानाच अचानक जीव सोडतो तो क्षण आम्हा डॉक्टरांसाठी खूप कठीण असतो असं त्यांनी सांगितले.

कोरोनाला हलक्यात घेऊ नका

भलेही कोरोनाचा धोका आत्ता आपल्याला कमी वाटत असला, कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी निष्काळजीपणा कधीच करू नका. कोरोना असा आजार आहे की ज्याच्याबद्दल काही अंदाज लावणं डॉक्टरांनाही जमलं नाही. कोणत्या व्यक्तीवर त्याचा कसा परिणाम होऊ शकेल याची माहिती नाही. जगभरात यावर रिसर्च सुरू आहे. तुम्ही लस घेतली असली तरी कोरोनापासून बचावासाठी उपाययोजना सोडू नका. मास्क लावल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका. हात वारंवार सॅनिटायझ करा. सोशल डिस्टेंसिंगचं पालन कायम करा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या