शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

CoronaVirus News: आता हर्ड इम्युनिटी देशाला कोरोनापासून वाचवणार?; आरोग्य मंत्रालय म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 19:36 IST

CoronaVirus News: मुंबई, दिल्लीतील अनेकांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्याचं सिरोचं सर्वेक्षण सांगतं

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १५ लाखांच्या पुढे गेला आहे. सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. दर दिवशी देशात कोरोनाचे जवळपास ५० हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आता हर्ड इम्युनिटीमुळे मुंबई आणि दिल्लीकरांच्या आशा वाढल्या आहेत. या दोन मोठ्या शहरांमधील अनेक नागरिकांना कोरोना होऊन गेला. त्यातून ते आपोआप बरे झाले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हर्ड इम्युनिटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यावर आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं भाष्य केलं.दिल्ली, मुंबईत झालेल्या सीरो सर्व्हेमधून अतिशय दिलासादायक आकडेवारी समोर आली. मुंबईतल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या ५७ टक्के, तर इमारतींमध्ये राहणाऱ्या १६ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं. तीन विभागांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली. त्यामुळे हर्ड इम्युनिटीच कोरोना संकटातून देशाला बाहेर काढेल, अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आज आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सरकारच्या वतीनं भाष्य केलं.भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात हर्ड इम्युनिटी कोरोनाचा सामना करण्याची रणनीती असू शकत नाही, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं. देशात सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता सामुदायिक संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र ती आरोग्य मंत्रालयानं फेटाळून लावली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या