शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

CoronaVirus News: देशात कोरोना मृत्यूदरात गुजरात पहिला; जाणून घ्या महाराष्ट्राची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:54 IST

भारतातील मृत्यू जगात सर्वात कमी; एका दिवसात महाराष्ट्रात १४०९ व दिल्लीत ४३७ जणांच्या मृत्यूची नोंद, तामिळनाडूचा मृत्यूदर सगळ्यात कमी १.०९ टक्का

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या बाधेने अनेक मृत्यू होतीलही कदाचित. मंगळवारी ३८० मृत्यू होते, ते दुसऱ्या दिवशी २००३ वर गेले तरी काळजीचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यांनी त्यांच्याकडील मृत्यूंची माहिती अद्ययावत केली. कारण राज्यांना केंद्र सरकार आणि न्यायालयांकडून कानपिचक्या मिळाल्या होत्या, त्या त्यांनी माहिती दडवून ठेवल्याबद्दल.मात्र, अभ्यासातून धक्कादायक तपशील समोर आला- देशात गुजरातेत मृत्यूची सरासरी १७ जून रोजी सर्वाधिक ६.२३ टक्के, तर महाराष्ट्राची ४.८८, दिल्ली ४.११ टक्के. तामिळनाडूने लॉकडाऊन लागू केल्यामुळे त्याचा मृत्यूदर सगळ्यात कमी म्हणजे १.०९ टक्का आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर राज्यांत मृत्यूदर हा सतत वाढता आहे. २० एप्रिल रोजी मृत्यूदर हा ४.५४ टक्क्यांवरून खाली आला. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन मे महिन्यात म्हणाले होते, भारतात कोरोना हा संसर्गजन्य नसल्यामुळे कोणीही घाबरून जायचे कारण नाही.17 दिवसांतील मृत्यूंच्या संख्येच्या माहितीचे ‘लोकमत’ने खोलवर जाऊन विश्लेषण केले. त्यातून हे स्पष्ट झाले की, भारतातील मृत्यूदर आणि मृत्यूंची संख्या ही जागतिक सरासरीच्या खूप खाली आहे.गेल्या १७ दिवसांतील संरचना (पॅटर्न) असे दाखवते की, ही टक्केवारी १७ जूनचा 3.36 टक्के हा एकमेव अपवाद वगळता तीन टक्क्यांच्या खाली राहिली आहे.‘लोकमत’च्या इन हाऊस अभ्यासात (३१ मे ते १७ जून) भारतातील मृत्यू ३१ मे रोजी 2.83% (५१६४ मृत्यू) होता. तर त्याच दिवशी जागतिक सरासरी5.99% (३,७२,०६७ मृत्यू) होती.१५ जून रोजी भारतात मृत्यूची टक्केवारी काहीशी वाढून ती 2.86% (मृत्यू ९५२०) झाली, तर त्याच दिवशी जागतिक सरासरी 5.46% (मृत्यू ४,३३,६५५) होती.भारतातील मृत्यूदर हा १७ जून रोजी ३.३६ टक्के, तर जागतिक सरासरी होती ५.४० टक्के.मृत्यूच्या संख्येची माहिती ही केस फॅटालिटी रेट म्हणून ओळखली जाते. याचा अर्थ एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यू.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूGujaratगुजरात