शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'निर्दयी मोदी सरकारला गरिबांची कणव नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 01:16 IST

काँग्रेस नेते चिदम्बरम यांची टीका

नवी दिल्ली : मोदी सरकार निर्दयी असून त्यांना ‘लॉकडाऊन’मुळे देशोधडीला लागलेल्या गरिबांची जराही कणव नाही, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी रविवारी केली.टष्ट्वीटरवरून ही टीका करताना चिदम्बरम यांना पहिल्या टष्ट्वीटमध्ये लिहिले की, हाती पैसा नसल्याने अधिकाधिक लोकांना नाईलाजाने मोफत जेवण वाटपाच्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे, ही वस्तुस्थिती भक्कम पुराव्यानिशी आता समोर येत आहे.दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये त्यांनी दोन प्रश्न उपस्थित केले. सरकार या गरिबांच्या खात्यांमध्ये थेट पैसे जमा करून त्यांची उपासमार व अब्रुचे धिंडवडे निघणे का थांबवीत नाही? अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये ७.७ कोटी टन अन्नधान्याचे साठे पडून असताना त्यातील काही धान्य सरकार या लोकांचे पोट भरण्यासाठी त्यांना मोफत का देत नाही? तिसरे टष्ट्वीट थेट पंतप्रधान मोदी व वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या रोखाने करून चिदम्बरम यांनी लिहिले की, हे दोन्ही प्रश्न अर्थकारणाप्रमाणेच नैतिकतेशीही निगडित आहेत. पण मोदीव सितारामन त्यांची उत्तरे देऊ शकत नसल्याने देश हताशपणे पाहात राहिला आहे.‘लॉकडाऊन’ वाढविण्याच्या मोदी यांच्या घोषणेचे काँग्रेसने स्वागत केले असले तरी या निर्बंधांमुळे सर्वाधिक झळ पोहोचलेला समाजातील गरीब व शोषित वर्ग तसेच स्थलांतरित कामगार यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आणखी मानवीय दृष्टीने पावले उचलायला हवीत, असा आग्रह हा विरोधी पक्ष करत आहे.पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी कोरोनासंबंधी पक्षाची ध्येयधोरणे ठरविण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ११सदस्यीय सल्लागार गट शनिवारी नेमला आहे. चिदम्बरम त्याचे सदस्य आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीP. Chidambaramपी. चिदंबरम