शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Coronavirus: भारतात कोरोनामुळे ४२ लाख मृत्यू होण्याचा दावा; केंद्रानं न्यूयॉर्क टाइम्सचा रिपोर्ट फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 08:15 IST

New York Times India Covid Death tolls: या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. चुकीच्या माहिती आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोणत्याही आधाराशिवाय मृत्यूची संख्या १२ पटीनं वाढवण्यात आली. जर हीच बाब न्यूयॉर्कबाबत लागू केली तर? भारतात कोरोना संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा जाणून घेण्यासाठी १२ पेक्षा अधिक तज्ज्ञांची मदत घेण्यात आलीभारतात ७० कोटी संक्रमित होतील तेव्हा ४२ लाख लोकांचा मृत्यू होण्याचा न्यूयॉर्क टाइम्सचा अंदाज

नवी दिल्ली – भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये केलेला दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापण्यात आलेला रिपोर्ट पूर्णपणे निराधार आहे. कोणत्या पुराव्यावर हा रिपोर्ट बनवला आहे असा सवालही केंद्र सरकारने केला. देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यात ऑक्सिजन आणि उपचाराअभावी अनेकांचा जीव गेल्याच्या बातम्या आल्यात. त्यातच न्यूयॉर्क टाइम्सच्या दाव्यानुसार भारतात कोरोनामुळे तब्बल ४० लाख मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.( New York Times report on COVID-19 toll in India is ‘completely baseless’ Says Central Government)  

यावर केंद्र सरकारकडून निती आयोगाचे सदस्य व्ही. के पॉल म्हणाले की, या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा आहे. चुकीच्या माहिती आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कशाच्या आधारावर तयार करण्यात आली? ५ लोकांनी फोन करून चौकशी करून रिपोर्ट तयार केला. कोणत्याही आधाराशिवाय मृत्यूची संख्या १२ पटीनं वाढवण्यात आली. जर हीच बाब न्यूयॉर्कबाबत लागू केली तर? असंही त्यांनी विचारलं आहे.

न्यूयॉर्कबाबत म्हणाल तर त्याठिकाणी मागील वर्षी मे महिन्यात २ लाख कोरोनाबाधित होते. तर सेरो सर्व्हेमध्ये १७ लाख लोक संक्रमित असल्याचं सांगण्यात आलं होतं. जर सेरो सर्व्हेच्या आकडेवारीवर नजर टाकली तर संक्रमणातून मृत्यूचा दर ०.५ टक्के इतका आहे. तर वास्तविक मृत्यूदर १.१. टक्के असल्याचं कळतं. आमच्याकडे आकडा ०.५ टक्के इतका आहे आणि रिपोर्टमध्ये तो ०.३ टक्के दाखवण्यात आला आहे म्हणजे ६ पट जास्त का? कोणत्या आधारावर आहे? असंही व्हि. के पॉल म्हणाले आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सचा दावा काय?

भारतात कोरोना संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा जाणून घेण्यासाठी १२ पेक्षा अधिक तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. या तज्त्रांनी भारतात कोरोना महामारीला तीन स्थितीत विभागणी केली आहे. यात सामान्य स्थिती, खराब स्थिती आणि अत्यंत खराब स्थिती. या तिघांमधील अत्यंत खराब स्थितीच्या रिपोर्टमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा २६ पटीनं जास्त अंदाज लावला आहे. संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर ०.६० इतका धरला आहे. हा अंदाज कोरोनाची दुसरी लाट आणि देशातील बिकट आरोग्य व्यवस्था हे पाहून लावला आहे. यात स्थितीत ७० कोटी लोक कोरोना संक्रमित झाल्यानंतर ४२ लाख लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतातील सध्याची स्थिती

भारतात कोरोना व्हायरसची एकूण रुग्णसंख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ इतकी आहे. त्यातील ३ लाख १५ हजार २३५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ११ हजार २७५ कोरोनाबाधित आढळले आहेत तर ३ हजार ८४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ८२ हजार ९२४ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार