शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Coronavirus: देशभरात साडेचार हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू! दिल्ली सावरतेय, मृतांचा आकडा दोनशे पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 09:51 IST

दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. बुधवारी ३,८४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली.

विकास झाडे

नवी दिल्ली : देशात कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे; परंतु मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ५२९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.

विशेष असे की, दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे. बुधवारी ३,८४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. महिनाभरातील हा सर्वात कमी आकडा आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचा पॉझिटिव्हिटी दर हा केवळ ५.७८ टक्के आहे. दि. २० एप्रिल रोजी ३६.२४ टक्के होता. एक महिन्यात दिल्लीतील स्थिती सावरताना दिसत आहे. बुधवारी दिल्लीत २३५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये भारताचा कोरोना मृत्यूदर १.११% नोंदवण्यात आला आहे. दोन दिवसातच जवळपास ८ हजार ८५८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दररोज ५ हजारांवर रुग्णांचा मृत्यू होईल असे तज्ज्ञांकडून भाकीत वर्तवण्यात आले होते. ते खरे ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ६७९ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५२५, तामिळनाडू ३६४, दिल्लीत २३५, उत्तर प्रदेशात २५५ रुग्णांचा मृत्यू झाला.

२४ तासांमध्ये २ लाख ६७ हजार ३३४ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. ३ लाख ८९ हजार ८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ५४ लाख ९६ हजार ३३० एवढी झाली आहे. यापैकी २ कोटी १९ लाख ८६ हजार ३६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर, ३२ लाख २६ हजार ७१९ रुग्णांवर (१२.६६%) उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख ८३ हजार २४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 

लसीकरण अभियानावर झाला परिणामदेशात कोरोना लसींचा अत्यावश्यक साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण अभियानावर त्याचा परिणाम झाला आहे. आतापर्यंत १८ कोटी ५८ लाख ९ हजार ३०२ डोस लावण्यात आले आहेत. मंगळवारी केवळ १३ लाख १२ हजार १५५ डोस लावण्यात आले. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी तपासण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. मंगळवारी २० लाख ८ हजार २९६ तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यत ३२ कोटी ३ लाख १ हजार १७७ तपासण्या करण्यात आल्या आहेत.

कोविड-१९ रुग्णांना उपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचा विचार करण्याचा सल्ला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिला. वकील एस. राजेंद्र प्रसाद आणि इतरांनी दाखल केलेल्या सार्वजनिक हिताच्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सी. प्रवीण कुमार आणि के. ललिता यांच्या खंडपीठाने सरकारला रुग्णांसाठी रुग्णालयांत किती खाटा उपलब्ध आहेत याची समग्र माहिती देण्यास सांगितले. खासगी रुग्णवाहिका चालकांनी मनमानी शुल्क आकारू नये यासाठी त्यांचे नियंत्रण घेण्याचा तसेच रुग्णालयांत मनुष्यबळाची टंचाई दूर करण्यासाठी नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची सेवा घेण्याचाही विचार करण्याचा सल्ला राज्य सरकारला न्यायालयाने दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या