शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: अर्थमंत्र्यांची घोषणा ५.९४ लाख कोटींची पण सरकारी खिशातून आता फक्त ५६,५०० कोटी जाणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 10:43 IST

यातील पहिल्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५ लाख ९४ हजार कोटींच्या दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या

ठळक मुद्देपंतप्रधान मोदी यांनी २० लाख कोटींचे मदत पॅकेज जाहीर केलेकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी बुधवारी पहिल्या टप्प्यात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्यापहिल्या टप्प्यात ५ लाख ९४ हजार कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली – कोरोनामुळे देशात गेल्या एक महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान सहन करावं लागत आहे. अनेक उद्योगधंदे, नोकरदार वर्गाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. यातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली होती.

यातील पहिल्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ५ लाख ९४ हजार कोटींच्या दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. मात्र प्रत्यक्षात यामधील फक्त ५६ हजार ५०० कोटी रुपये खर्च सरकारच्या खिशातून जाणार आहे. यामागचं गणित समजून घेऊया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एमएसएमईपासून रिअर इस्टेट कंपन्या आणि सामान्य करदात्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० लाख कोटी देण्याची घोषणा आतापर्यंत सर्वात मोठं आर्थिक पॅकेज आहे.

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा पुढीलप्रमाणे

  • एमएसएमई सेक्टरसाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्जपुरवठा करणारे पॅकेज जाहीर
  • अडचणीत असलेल्या एमएसएमईना २०००० कोटींचे पॅकेज देण्यात येणार
  • उद्योगांच्या विस्तारासाठी फंड उभारण्यात येणार आहे, यातून ५०००० कोटी रुपये देण्यात येणार
  • कर्मचाऱ्यांच्या पीएफ योगदानासाठी केंद्र सरकारने २५०० कोटी रुपये दिले
  • व्यवसाय आणि कर्मचार्‍यांचे ईपीएफ योगदान कमी करण्यासाठी ६ हजार ५०० कोटींची मदत
  • गैर-बँकिंग वित्तीय कंपन्या, गृहनिर्माण संस्था, एमएफआय यांना ३० हजार कोटींची रोख सुविधा
  • एनबीएफसीसाठी ४५००० कोटी रुपयांचे खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाणार
  • ९०००० कोटी रुपयांचे पॅकेज वीज वितरण कंपन्यांना देण्यात येणार
  • टीडीएस, टीसीएस दरात २५ टक्क्यांची कपातीसाठी ५० हजार कोटींची मदत

 

वास्तविक, अर्थमंत्र्यांनी केलेल्या बहुतांश घोषणांमध्ये फक्त टीडीएस आणि टीसीएस दरात घट झाल्यापासून सुमारे ५० हजार कोटी रुपये, एमएसएमईला  ४ हजार कोटी रुपये आणि १५ हजार पेक्षा कमी पगाराच्या पीएफ खात्यांना २,५०० कोटींची मदत म्हणजेच एकूण ५६,५०० कोटी रुपये थेट सरकारी तिजोरीतून खर्च केले जात आहेत.

आयडीएफसी एएमसी इंडियाचे इकॉनॉमिस्ट श्रीजित बालसुब्रह्मण्यम म्हणतात की, टीडीएस / टीसीएसमधील कपातीचा थेट परिणाम सरकारी तिजोरीवर होईल. इतर उपाय मुख्यतः पत हमीच्या स्वरूपात आहेत आणि त्याचा सरकारी तिजोरीवर थेट किंवा त्वरित परिणाम होत नाही. त्याचसोबत अशा कर्जाची हमी म्हणजे जेव्हा कोणी कर्जाची रक्कम परत देत नाही तेव्हाच सरकारला पैसे द्यावे लागतात त्यामुळे सरकारी तिजोरीवर नुकसान होतं पण हे तात्काळ होत नाही तर पुढच्या कित्येक वर्षांत होऊ शकतं. दरम्यान, वीज वितरण कंपन्यांना सहकार्य करण्यासारखे अनेक पावले पीएसयूमधून जाईल ज्यात सरकारचा अद्याप कोणता खर्च नाही अन्यथा बँका किंवा राज्य सरकारांच्या माध्यमातून केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केले.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय अर्थमंत्री आज मोठ्या घोषणा करण्याची शक्यता, शेतकऱ्यांना जबरदस्त फायदा मिळणार?

पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी

...तर येत्या ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त एड्स रुग्णांचा मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट

आयुष्यात ‘ती’ गोष्ट जिव्हारी लागली; एमबीबीएस डॉक्टर थेट IAS अधिकारी बनली!

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या