शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

Coronavirus: सोनिया अन् राहुल गांधींवर का भडकली भिलवाडा गावातील ‘ही’ महिला सरपंच?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 13:28 IST

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिलं

ठळक मुद्देकोरोना रोखण्याबाबत भिलवाडा पॅटर्न देशभरात प्रसिद्ध ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची नव्हेभिलवाडाच्या देवरिया गावच्या सरपंच भडकल्या

जयपूर – जगभरात दहशत पसरलेल्या कोरोना व्हायरसने १७ लाखांहून अधिक लोकांना जाळ्यात ओढलं आहे तर १ लाखांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे ७ हजारांहून जास्त रुग्ण आढळले आहेत तर २३० हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अशातच कोरोनाच्या लढाईत राजस्थानच्या भिलवाडा गावाचा पॅटर्न नावारुपाला आला.

भिलवाडा गाव देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट होतं. मात्र आता इथली परिस्थिती सुधारली आहे. या गावात गेल्या ८ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर सुरुवातीच्या २७ रुग्णापैकी १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भिलवाडाचं कौतुक करत देशभरात भिलवाडा पॅटर्न राबवण्यासाठी माहिती मागवली आहे. कोरोना पूर्णपणे रोखण्यास भिलवाडा गावाला यश आलं. प्रशासनाने संपूर्ण सक्तीने याठिकाणी स्किनिंग केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यामुळे याचं श्रेय लाटण्यासाठी अनेकांनी उडी घेतली आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकार आणि राहुल गांधी यांना या लढाईचं श्रेय दिलं त्यामुळे भिलवाडाच्या देवरिया गावच्या सरपंच किस्मत गुर्जर या नाराज झाल्या. त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सोनिया गांधीच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. किस्मत गुर्जर म्हणतात की, आज जो भिलवाडा पॅटर्न प्रसिद्ध झालाय त्याच्यामागे शेतकरी, महिला, गावकरी आणि भिलवाड्यातील स्वयसेवी संस्था यांची मेहनत आहे. मागील काही दिवसांपासून राज्य सरकार यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या लोकांनी कोरोनाशी लढण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, याठिकाणी लोकांनी फक्त लॉकडाऊनचं पालन केले नाही तर सोशल डिस्टेंसिग आणि स्वच्छतेचीही काळजी घेतली. ही वेळ राजकीय स्वार्थ साधण्याची नव्हे तर सतर्कता आणि संयम ठेवण्याची आहे असं त्या म्हणाल्या.

काय आहे भिलवाडा पॅटर्न?

भिलवाडा पॅटर्न हा आरोग्य विभाग, पोलीस आणि प्रशासन यांच्या संयुक्त सुसंवादाचा एक चांगलं उदाहरण आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सर्व मेडिकल कॉलजमध्ये आरआरटीचं गठण केले होते. भिलवाडा जिल्हाधिकारी राजेंद्र भट यांच्या नेतृत्वात आरआरटी काम करत होती. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडताच तातडीने आरआरटी(Rapid Response Team)  त्या परिसरात पाठवली जात होती. १, ३ आणि ५ किमी परिसरात कर्फ्यू आणि महाकर्फ्यू लावला जात असे. प्रत्येक घरातील सदस्यांची २ ते ३ वेळा स्क्रिनिंग केली जात होती. जर कोणामध्ये लक्षण आढळले तर १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले जात असे. आयसोलेशन वार्डमध्ये ठेवलं जात असे. मोठ्या प्रमाणात संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात. अशाप्रकारे काम केल्यामुळे गेल्या ८ दिवसात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSonia Gandhiसोनिया गांधीRajasthanराजस्थान