शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: दिल्ली पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अरविंद केजरीवाल केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

By बाळकृष्ण परब | Updated: November 17, 2020 14:05 IST

Delhi Corona News : दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. सध्याच्या घडीला देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक रुग्ण दिल्लीत सापडत आहेत.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे.दिल्लीत दर तासाला चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहेनोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ११०० पेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. सध्याच्या घडीला देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक रुग्ण दिल्लीत सापडत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने अनलॉकदरम्यान, नागरिकांना दिलेल्या अनेक सवलती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न होत असल्यास गर्दी होणारे बाजार तात्पुरते बंद करण्याची परवानगी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून मागण्यात येणार आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दिल्ली सरकारने विवाह सोहळ्यांना दिलेली सूट रद्द केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही विवाह सोहळ्यांसाठी २०० जणांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती. मात्र आता केवळ ५० लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी असेल. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यावर ही मर्यादा वाढवण्यात आली होती. मात्र आता ती मागे घेण्यात येत आहे.दरम्यान, दिल्ली सरकार कोरोनाच्या संसर्गाबाबत केंद्र सरकारला एक प्रस्तावही पाठवणार आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न होण्याच्या परिस्थितीत दिल्लीतील गर्दीवर्दळ असणारे बाजार तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची परवानगी मागण्यात येणार आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या पुरेशा प्रमाणात आहे. मात्र आयसीयूची सुविधा असलेल्या बेडची संख्या कमी आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. त्यांनी सांगितले की, सर्व सरकारे मिळून काम करत आहेत. मात्र सर्वात मोठी गरज आहे ती लोकांनी काळजी घेण्याची. अनेक जण मास्क न लावता फिरत आहेत. माझे आवाहन आहे की, कृपया मास्क वापरा. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करा.  दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे. दिल्लीत दर तासाला चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ११०० पेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.तर भारतामध्ये आतापर्यंत एकूण ८८ लाख ७४ हजारहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर देशात आतापर्यंत १.३० लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केरळ ही कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल