शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

coronavirus: दिल्ली पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने? अरविंद केजरीवाल केंद्राकडे पाठवणार प्रस्ताव

By बाळकृष्ण परब | Updated: November 17, 2020 14:05 IST

Delhi Corona News : दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. सध्याच्या घडीला देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक रुग्ण दिल्लीत सापडत आहेत.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे.दिल्लीत दर तासाला चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहेनोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ११०० पेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत चालला आहे. सध्याच्या घडीला देशातील इतर कुठल्याही राज्यापेक्षा अधिक रुग्ण दिल्लीत सापडत आहेत. त्यामुळे दिल्ली सरकार आणि प्रशासनाची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाने अनलॉकदरम्यान, नागरिकांना दिलेल्या अनेक सवलती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न होत असल्यास गर्दी होणारे बाजार तात्पुरते बंद करण्याची परवानगी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून मागण्यात येणार आहे.कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दिल्ली सरकारने विवाह सोहळ्यांना दिलेली सूट रद्द केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आम्ही विवाह सोहळ्यांसाठी २०० जणांना सहभागी होण्याची परवानगी दिली होती. मात्र आता केवळ ५० लोकांना विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी असेल. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यावर ही मर्यादा वाढवण्यात आली होती. मात्र आता ती मागे घेण्यात येत आहे.दरम्यान, दिल्ली सरकार कोरोनाच्या संसर्गाबाबत केंद्र सरकारला एक प्रस्तावही पाठवणार आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न होण्याच्या परिस्थितीत दिल्लीतील गर्दीवर्दळ असणारे बाजार तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची परवानगी मागण्यात येणार आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या पुरेशा प्रमाणात आहे. मात्र आयसीयूची सुविधा असलेल्या बेडची संख्या कमी आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आहे. त्यांनी सांगितले की, सर्व सरकारे मिळून काम करत आहेत. मात्र सर्वात मोठी गरज आहे ती लोकांनी काळजी घेण्याची. अनेक जण मास्क न लावता फिरत आहेत. माझे आवाहन आहे की, कृपया मास्क वापरा. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करा.  दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या महाराष्ट्रापेक्षाही अधिक आहे. दिल्लीत दर तासाला चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ११०० पेक्षा अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.तर भारतामध्ये आतापर्यंत एकूण ८८ लाख ७४ हजारहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर देशात आतापर्यंत १.३० लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या घडीला दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि केरळ ही कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल