शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

Coronavirus : भारतासाठी गंभीर इशारा, वैज्ञानिकांचा अहवाल; मे मध्ये कोरोनाबाधित १३ लाखांपर्यंत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 06:10 IST

coronavirus : मोठ्या प्रमाणात तपासणीच होत नसल्याने आतापर्यंत भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्याने समाजात किती शिरकाव केला आहे, हे सांगणे अशक्य आहे.

नवी दिल्ली : कोरोना बाधितांची संख्या भारतात सध्या ज्या गतीने वाढते आहे, ती गती अशीच राहिल्यास मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही संख्या एक लाख ते १३ लाखांपर्यंत होऊ शकते. परिणामी, भारतासमोर गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशारा वैज्ञानिकांच्या एका आंतरराष्ट्रीय पथकाने आपल्या अहवालात दिला आहे.या अहवालात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात अन्य देशांच्या तुलनेत भारताने चांगले नियंत्रण ठेवल्याचे दिसते. मात्र, या रुग्णांचा आढावा घेताना काही महत्त्वाच्या घटकांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामध्ये कोरोनाची चाचणी, त्या चाचणीची अचुकता, कोरोनाचा संसर्ग झाला आहे मात्र त्यांची लक्षणे दिसलेली नाहीत, अशा रुग्णांचे तपासणीचे परिमाण यांचा समावेश आहे, असे अमेरिकेतील जॉन्स हापकिन्स विद्यापीठाच्या देबश्री रॉय यांच्यासह संशोधकांच्या या पथकाने म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात तपासणीच होत नसल्याने आतापर्यंत भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्याने समाजात किती शिरकाव केला आहे, हे सांगणे अशक्य आहे. हेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर रुग्णालये आणि आरोग्य सुविधांच्या बाहेर असलेले कितीजण बाधित आहेत, याचा अंदाज कसा लागणार, असेही या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या