शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

coronavirus : 'देशाला मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, कोरोना आपत्तीसाठी १५ हजार कोटींची तरतूद'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 21:12 IST

जनता कर्फ्युदिनी नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता दाखवलेल्या अतिउत्साहाबद्दल मोदींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, लोकांनी अद्यापही कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नसल्याचं सांगत मोदींनी संताप व्यक्त केला होता

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. त्यानंतर, मोदींनी आज पुन्हा देशवासियांना संबोधित केले आहे. पुढील २१ दिवस देशात लॉक डाऊन राहणार असल्याचे सांगत देशावासियांसाठी हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले. तसेच, जान है तो जहान है... असे म्हणत नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. तर, देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असेही मोदींनी सांगितले.

जनता कर्फ्युदिनी नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता दाखवलेल्या अतिउत्साहाबद्दल मोदींनी ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली होती. तसेच, लोकांनी अद्यापही कोरोनाला गंभीरतेनं घेतलं नसल्याचं सांगत मोदींनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर, आज पुन्हा एकदा मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला आहे. त्यात, पुढील २१ दिवसांसाठी देशात लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी जाहीर केले. आज रात्री १२ वाजल्यापासून हा लॉक डाऊन करण्यात येत असल्याचे मोदींनी सांगितले. हे २१ दिवस जर आपण नाही सांभाळले तर आपला देश २१ वर्षे मागे जाऊ शकतो. कोरोनाच्या संकटाची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत याचा मोठा विपरीत परिणाम होणार आहे. केंद्र सरकारकडून कोरोनाच्या प्रादुर्भाव संकटासाठी, देशातील आरोग्यसेवेला गरज म्हणून १५  हजार कोटी रुपयांची तरतूद केलीय, असेही मोदींनी सांगितले. 

सोशल डिस्टन्सी फक्त रुग्णांसाठी नसून प्रत्येक नागरिकासाठी आहे, देशाच्या पंतप्रधानांसाठीही आहे. निष्काळजीपण जर असाच राहिला तर देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल. देशातील अनेक भागात लॉक डाऊन करण्यात आलं आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला गंभीरतेनं घेतलं पाहिजे. आज रात्री १२ वाजल्यापासून देशात लॉक डाऊन करण्यात येत आहे, असे मोदींनी जाहीर केले. हा लॉक डाऊन जनता कर्फ्युचं पुढील पाऊल आहे. या लॉक डाऊनची आर्थिक किंमत देशाला मोजावी लागणार आहे. मात्र, देशातील प्रत्येक भारतीयाला वाचवणे हीच माझी, भारत सरकारची, राज्य सरकारची आणि स्थानिक संस्थांची प्राथमिकता असल्याचं मोदींनी म्हटलं. तसेच, मी हात जोडून सर्वांना विनंती करतोय, सध्या तुम्ही जिथं आहात तिथंच राहावे. पुढील २१ दिवसांसाठी हा लॉक डाऊन राहणार आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याprime ministerपंतप्रधानEconomyअर्थव्यवस्था