शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

Coronavirus: “पहिल्यांदा खोकला, त्यानंतर तीव्र ताप अन् शेवटी श्वास थांबतो”; १५ दिवसांत ३२ जणांचा रहस्यमय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 19:55 IST

हीच अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. याठिकाणी खोकला, अतिताप आणि श्वास थांबल्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत.

ठळक मुद्देविवारी आरोग्य विभागाने अडिला गावात जाऊन मृतकाच्या कुटुंबासह ७२ लोकांची अँन्टिजेन चाचणी केली गावात कोरोनासोबतच आणखी एका आजाराची दहशत गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी अंतरावर अडिला गावात आरोग्याच्या सर्व सुविधा आहेत.

देवरिया – उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील अडिला गावात गेल्या १५ दिवसांत २० लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. या गावातील बऱ्याच जणांचे मुंडन झालेले पाहून अनेकांना धक्का बसत आहे. गावात प्रवेश केल्यानंतर कोणाच्या घरात दहावा असतो तर कोणाच्या घरात श्राद्धाची तयारी सुरू असते. काही लोक स्मशानभूमीतून कोणावर अंत्यसंस्कार करून परतलेले असतात.

हीच अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. याठिकाणी खोकला, अतिताप आणि श्वास थांबल्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. बैदा गावांत एक आठवड्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी आरोग्य विभागाने अडिला गावात जाऊन मृतकाच्या कुटुंबासह ७२ लोकांची अँन्टिजेन चाचणी केली. परंतु एकच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे नेमकं इतरांच्या मृत्यूचं कारण काय? याचा तपास आरोग्य विभाग करत आहे. गावात कोरोनासोबतच आणखी एका आजाराची दहशत गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे गावात शांतता पसरली असते. लोक एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत. गावांत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही.

जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी अंतरावर अडिला गावात आरोग्याच्या सर्व सुविधा आहेत. गावात आरोग्य केंद्रापासून हेल्थ आणि वेलनेस सेंटरही आहे. १५ दिवसांपासून गावात मृत्यूची मालिका सुरु झालीय आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी झालेल्यांमध्ये १५ लोकांचे वय ६५ ते ७० वयोगटातील आहे. तर अन्य २४ ते ५० वयोगटातील आहेत. सर्वांच्या मृत्यूचं कारण एकच आजार आहे. पहिला खोकला, तीव्र ताप त्यानंतर अचानक श्वास थांबून मृत्यू होत आहेत.

गावातील ७२ जणांची अँन्टिजेन चाचणी मात्र केवळ १ पॉझिटिव्ह

मृतकांमध्ये कोणीही कोरोनाची चाचणी केली नव्हती. पण सुरुवातीच्या लक्षणांप्रमाणे या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगण्यात आलं. रविवारी आरोग्य विभागाने गावात जाऊन मृतकांच्या कुटुंबासह ७२ जणांची अँन्टिजेन चाचणी केली. ज्यात १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे गावात कोरोनाव्यतिरिक्त अन्य दुसरा आजार आल्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे.

अधिकारी काय म्हणाले?

अँन्टिजेन चाचणी योग्य मानली जाते. काही लोकांसाठी आजाराची भीतीही धोकादायक ठरू शकते असं मुख्य आरोग्य अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले. गावाचे सरपंच विनीत उपाध्याय म्हणाले की, गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक भीतीच्या सावटाखाली आहेत की आता याच्यानंतर कोणाचा नंबर येईल. तर वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे इंफेक्शन होत आहेत. सध्या गावाला सॅनिटायझ केले जात आहे. आरोग्य विभाग याचा तपास करत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष निरंजन यांनी दिली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या