शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

Coronavirus: “पहिल्यांदा खोकला, त्यानंतर तीव्र ताप अन् शेवटी श्वास थांबतो”; १५ दिवसांत ३२ जणांचा रहस्यमय मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 19:55 IST

हीच अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. याठिकाणी खोकला, अतिताप आणि श्वास थांबल्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत.

ठळक मुद्देविवारी आरोग्य विभागाने अडिला गावात जाऊन मृतकाच्या कुटुंबासह ७२ लोकांची अँन्टिजेन चाचणी केली गावात कोरोनासोबतच आणखी एका आजाराची दहशत गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी अंतरावर अडिला गावात आरोग्याच्या सर्व सुविधा आहेत.

देवरिया – उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील अडिला गावात गेल्या १५ दिवसांत २० लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांची तब्येत बिघडली आहे. या गावातील बऱ्याच जणांचे मुंडन झालेले पाहून अनेकांना धक्का बसत आहे. गावात प्रवेश केल्यानंतर कोणाच्या घरात दहावा असतो तर कोणाच्या घरात श्राद्धाची तयारी सुरू असते. काही लोक स्मशानभूमीतून कोणावर अंत्यसंस्कार करून परतलेले असतात.

हीच अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांची आहे. याठिकाणी खोकला, अतिताप आणि श्वास थांबल्यामुळे लोकांचे मृत्यू होत आहेत. बैदा गावांत एक आठवड्यात १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी आरोग्य विभागाने अडिला गावात जाऊन मृतकाच्या कुटुंबासह ७२ लोकांची अँन्टिजेन चाचणी केली. परंतु एकच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे नेमकं इतरांच्या मृत्यूचं कारण काय? याचा तपास आरोग्य विभाग करत आहे. गावात कोरोनासोबतच आणखी एका आजाराची दहशत गावकऱ्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे गावात शांतता पसरली असते. लोक एकमेकांशी बोलायलाही तयार नाहीत. गावांत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही.

जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी अंतरावर अडिला गावात आरोग्याच्या सर्व सुविधा आहेत. गावात आरोग्य केंद्रापासून हेल्थ आणि वेलनेस सेंटरही आहे. १५ दिवसांपासून गावात मृत्यूची मालिका सुरु झालीय आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी झालेल्यांमध्ये १५ लोकांचे वय ६५ ते ७० वयोगटातील आहे. तर अन्य २४ ते ५० वयोगटातील आहेत. सर्वांच्या मृत्यूचं कारण एकच आजार आहे. पहिला खोकला, तीव्र ताप त्यानंतर अचानक श्वास थांबून मृत्यू होत आहेत.

गावातील ७२ जणांची अँन्टिजेन चाचणी मात्र केवळ १ पॉझिटिव्ह

मृतकांमध्ये कोणीही कोरोनाची चाचणी केली नव्हती. पण सुरुवातीच्या लक्षणांप्रमाणे या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगण्यात आलं. रविवारी आरोग्य विभागाने गावात जाऊन मृतकांच्या कुटुंबासह ७२ जणांची अँन्टिजेन चाचणी केली. ज्यात १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे गावात कोरोनाव्यतिरिक्त अन्य दुसरा आजार आल्याची भीती गावकऱ्यांमध्ये आहे.

अधिकारी काय म्हणाले?

अँन्टिजेन चाचणी योग्य मानली जाते. काही लोकांसाठी आजाराची भीतीही धोकादायक ठरू शकते असं मुख्य आरोग्य अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले. गावाचे सरपंच विनीत उपाध्याय म्हणाले की, गावात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. लोक भीतीच्या सावटाखाली आहेत की आता याच्यानंतर कोणाचा नंबर येईल. तर वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे इंफेक्शन होत आहेत. सध्या गावाला सॅनिटायझ केले जात आहे. आरोग्य विभाग याचा तपास करत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष निरंजन यांनी दिली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या