शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

CoronaVirus: मद्यप्रेमींसाठी खूशखबर! 'या' दोन राज्यांत आजपासून उघडली दारूची दुकानं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:07 IST

अनेक राज्य सरकारं दारू विक्री सुरू करायची की नाही, यासंदर्भात विचारात पडली आहेत.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असून, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढवायचा की काढायचा याचा निर्णय 130 कोटी देशवासीयांना सांगणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच दुकानं बंद असल्यानं मद्यप्रेमींचा हिरमोड झाला आहे. अनेक राज्य सरकारं दारू विक्री सुरू करायची की नाही, यासंदर्भात विचारात पडली आहेत. हरियाणामध्ये लॉकडाऊन असूनही दारूविक्री सुरूच आहे. केरळमधील आत्महत्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं दारू पिण्याचा सल्ला देण्यात आला होता. दारूच्या दुकानांतून सरकारला महसूलही मोठ्या प्रमाणात मिळतो.दरम्यान, आसाम आणि मेघालय या दोन ईशान्यकडच्या राज्यांनी सोमवारपासून दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, आसामच्या उत्पादन शुल्क विभागाने सोमवारपासून दारूची दुकाने, गोडाऊन, बाटल्यांचे कारखाने, दारूभट्टी उघडण्यास परवानगी दिली आहे. या काळात बीअर बार पूर्णपणे बंद राहतील. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दारूची दुकानं उघडी  राहतील. दुकानांमध्ये कमीत कमी कर्मचार्‍यांसह काम करण्याचे आणि बाटल्या किंवा रोख रक्कम घेताना ग्राहक व कर्मचार्‍यांना हाताला सॅनिटायझर लावावे किंवा हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात आले आहे. बाटल्यांचे कारखाने, दारूभट्टीवर दारू बनविणारे आणि डिस्टिलर यांना त्यांच्या ठरावीक कर्मचाऱ्यांबरोबरच फक्त 50 टक्के कामगारांच्या उपस्थितीत काम करावे लागेल. त्यांना आपल्या कर्मचार्‍यांना आवारात किंवा जवळपासच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी लागेल. लॉकडाउन सुरू झाल्यापासून देशी दारूचे अवैध उत्पादन व विक्री अनेक पटीने वाढल्याचे एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अधिकृत दुकाने उघडण्यास परवानगी न दिल्यास बेकायदेशीररीत्या मद्यपान करून लोकांचा मृत्यू ओढावण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतासह जगाचा एक तृतीयांश भाग लॉकडाऊनमध्ये आहे. भारतात कोरोना संक्रमणाची संख्या नऊ हजारांच्या वर पोहोचली आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 35 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9152 आहे. यापैकी 7987 पॉझिटिव्ह आहेत, तर 856 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे आणि आतापर्यंत 308 लोकांचा मृत्यू झाला आहे. आज नागालँडमध्ये कोरोना पॉझिटिव्हची पहिली घटना समोर आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात 82, उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये 30, गुजरातमध्ये 22, मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 22, कर्नाटकात 15, आंध्र प्रदेशात 12, राजस्थानमधील 11 आणि मुंबईतील धारावीत आज चार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या