शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मोदीजी, भगवान के लिए इनकी मदद कीजिए; प्रियंका गांधींनी मांडलं मजुरांचं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 21:23 IST

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला

लखनऊ – देशात आणि राज्यात कोरोनाव्हायरसचा धोका सतत वाढत आहे. हे पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशव्यापी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली तर बुधवारी गृह मंत्रालयाने २० एप्रिलपासून कमी जोखीम असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन प्रक्रियेत शिथिलता सूट देण्याची तयारी केली. सवलतींशी संबंधित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांमध्ये कृषी, आरोग्य, बांधकाम कामे, वाहतुकीशी संबंधित काही कामांना सशर्त सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या वेळी मालगाडी वगळता सार्वजनिक वाहतुकीसारख्या इतर कोणत्याही रेल्वे किंवा बसला सुरु करण्यास परवानगी दिली नाही. यासंदर्भात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या कामगारांच्या मुद्द्यावरुन लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कामगारांना मदत करावी असं सांगत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, प्रत्येक वेळी गरीब आणि मजुरांवर संकट का येते? त्यांची परिस्थिती लक्षात घेता निर्णय का घेतले जात नाहीत? त्यांना रामभरोसे का सोडलं जातं? लॉकडाऊन दरम्यान रेल्वे तिकिटांचे बुकिंग का चालू ठेवले? विशेष गाड्यांची व्यवस्था का करण्यात आली नाही? त्यांचे पैसे संपत आहेत, रेशन संपत आहे, त्यांना असुरक्षित वाटत आहे, त्यांना गावी घरी जायचे आहे. याची व्यवस्था करायला हवी होती. अद्यापही योग्य नियोजनाने मदत करण्याची व्यवस्था होऊ शकते. कामगार या देशाचा कणा आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवासाठी त्यांना मदत करा अशी विनंती त्यांनी केली आहे.

देशात सतत वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २४  मार्च रोजी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जी व्यक्ती जिथं असेल तिथेच राहावं, घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आणले. यामुळे विविध राज्यात अडकलेले हजारो मजूर १४ एप्रिलची आतुरतेने त्यांच्या घरी जाण्याची वाट पाहत होते. परंतु, कोरोना विषाणूचा धोका कमी होण्यापेक्षा तो वाढत गेला. पंतप्रधान मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, सूरत आणि मुंबईतील वांद्रे यासारख्या रेल्वे स्थानकांवर शहरात अडकलेले हजारो कामगार त्यांच्या घरी जाण्यासाठी जमल्याचं चित्र पाहायला मिळालं.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी