शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Coronavirus: मोदीजी, भगवान के लिए इनकी मदद कीजिए; प्रियंका गांधींनी मांडलं मजुरांचं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 21:23 IST

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला

लखनऊ – देशात आणि राज्यात कोरोनाव्हायरसचा धोका सतत वाढत आहे. हे पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशव्यापी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली तर बुधवारी गृह मंत्रालयाने २० एप्रिलपासून कमी जोखीम असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन प्रक्रियेत शिथिलता सूट देण्याची तयारी केली. सवलतींशी संबंधित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांमध्ये कृषी, आरोग्य, बांधकाम कामे, वाहतुकीशी संबंधित काही कामांना सशर्त सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या वेळी मालगाडी वगळता सार्वजनिक वाहतुकीसारख्या इतर कोणत्याही रेल्वे किंवा बसला सुरु करण्यास परवानगी दिली नाही. यासंदर्भात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या कामगारांच्या मुद्द्यावरुन लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कामगारांना मदत करावी असं सांगत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, प्रत्येक वेळी गरीब आणि मजुरांवर संकट का येते? त्यांची परिस्थिती लक्षात घेता निर्णय का घेतले जात नाहीत? त्यांना रामभरोसे का सोडलं जातं? लॉकडाऊन दरम्यान रेल्वे तिकिटांचे बुकिंग का चालू ठेवले? विशेष गाड्यांची व्यवस्था का करण्यात आली नाही? त्यांचे पैसे संपत आहेत, रेशन संपत आहे, त्यांना असुरक्षित वाटत आहे, त्यांना गावी घरी जायचे आहे. याची व्यवस्था करायला हवी होती. अद्यापही योग्य नियोजनाने मदत करण्याची व्यवस्था होऊ शकते. कामगार या देशाचा कणा आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवासाठी त्यांना मदत करा अशी विनंती त्यांनी केली आहे.

देशात सतत वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २४  मार्च रोजी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जी व्यक्ती जिथं असेल तिथेच राहावं, घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आणले. यामुळे विविध राज्यात अडकलेले हजारो मजूर १४ एप्रिलची आतुरतेने त्यांच्या घरी जाण्याची वाट पाहत होते. परंतु, कोरोना विषाणूचा धोका कमी होण्यापेक्षा तो वाढत गेला. पंतप्रधान मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, सूरत आणि मुंबईतील वांद्रे यासारख्या रेल्वे स्थानकांवर शहरात अडकलेले हजारो कामगार त्यांच्या घरी जाण्यासाठी जमल्याचं चित्र पाहायला मिळालं.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी