शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

Coronavirus: मोदीजी, भगवान के लिए इनकी मदद कीजिए; प्रियंका गांधींनी मांडलं मजुरांचं दुःख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 21:23 IST

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला

लखनऊ – देशात आणि राज्यात कोरोनाव्हायरसचा धोका सतत वाढत आहे. हे पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशव्यापी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्याची घोषणा केली तर बुधवारी गृह मंत्रालयाने २० एप्रिलपासून कमी जोखीम असलेल्या ठिकाणी लॉकडाऊन प्रक्रियेत शिथिलता सूट देण्याची तयारी केली. सवलतींशी संबंधित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांमध्ये कृषी, आरोग्य, बांधकाम कामे, वाहतुकीशी संबंधित काही कामांना सशर्त सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या वेळी मालगाडी वगळता सार्वजनिक वाहतुकीसारख्या इतर कोणत्याही रेल्वे किंवा बसला सुरु करण्यास परवानगी दिली नाही. यासंदर्भात कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देशाच्या विविध राज्यात अडकलेल्या कामगारांच्या मुद्द्यावरुन लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने कामगारांना मदत करावी असं सांगत केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधताना आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, प्रत्येक वेळी गरीब आणि मजुरांवर संकट का येते? त्यांची परिस्थिती लक्षात घेता निर्णय का घेतले जात नाहीत? त्यांना रामभरोसे का सोडलं जातं? लॉकडाऊन दरम्यान रेल्वे तिकिटांचे बुकिंग का चालू ठेवले? विशेष गाड्यांची व्यवस्था का करण्यात आली नाही? त्यांचे पैसे संपत आहेत, रेशन संपत आहे, त्यांना असुरक्षित वाटत आहे, त्यांना गावी घरी जायचे आहे. याची व्यवस्था करायला हवी होती. अद्यापही योग्य नियोजनाने मदत करण्याची व्यवस्था होऊ शकते. कामगार या देशाचा कणा आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देवासाठी त्यांना मदत करा अशी विनंती त्यांनी केली आहे.

देशात सतत वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २४  मार्च रोजी संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जी व्यक्ती जिथं असेल तिथेच राहावं, घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आणले. यामुळे विविध राज्यात अडकलेले हजारो मजूर १४ एप्रिलची आतुरतेने त्यांच्या घरी जाण्याची वाट पाहत होते. परंतु, कोरोना विषाणूचा धोका कमी होण्यापेक्षा तो वाढत गेला. पंतप्रधान मोदींनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, सूरत आणि मुंबईतील वांद्रे यासारख्या रेल्वे स्थानकांवर शहरात अडकलेले हजारो कामगार त्यांच्या घरी जाण्यासाठी जमल्याचं चित्र पाहायला मिळालं.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी