शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

कोरोनाचा फैलाव रोखण्यात केंद्र सरकार अपयशी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:17 IST

कोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना कवारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असते.

ठळक मुद्देकोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होतीकोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदाआंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असतेछत्तीसगड सरकारने राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात आम्हाला यश आले

रायपूर -  देशातील कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. विविध भागात नव्याने रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले असून, देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांचा आकडा 5 हजार 734 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी कोरोना विषाणूच्या होत असलेल्या फैलावावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप भुपेश बघेल यांनी केला आहे.

आम्ही राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊन काम केले त्यामुळे आमच्या राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावाही बघेल यांनी यावेळी केला. भुपेश बघेल म्हणाले की, 'कोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना कवारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असते. दुसरीकडे मी राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्हाला यश आले.'

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी  मोफत व्हायला पाहिजे तसेच याचा खर्च केंद्र सरकारने उचलला पाहिजे. तसेच केंद्र सरकारने जनधन खात्यात 500 ऐवजी 750 रुपये जमा केले पाहिजेत तसेच सर्व तीन हप्ते एकाच वेळी पाठवले पाहिजेत, अशी मागणी बघेल यांनी केली.

दरम्यान, छत्तीसगड सरकारने राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात आम्हाला यश आले. राज्यात 76 हजार लोकांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. राज्याची सीमा सील करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवरही सिलिंग करण्यात आले आहे. गावात आलेल्या प्रवासी मजुरांना गावाच्या सीमेबाहेर ठेवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसPoliticsराजकारण