शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कोरोनाचा फैलाव रोखण्यात केंद्र सरकार अपयशी, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 16:17 IST

कोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना कवारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असते.

ठळक मुद्देकोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होतीकोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदाआंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना क्वारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असतेछत्तीसगड सरकारने राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात आम्हाला यश आले

रायपूर -  देशातील कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढत आहे. विविध भागात नव्याने रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले असून, देशात आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांचा आकडा 5 हजार 734 पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी कोरोना विषाणूच्या होत असलेल्या फैलावावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप भुपेश बघेल यांनी केला आहे.

आम्ही राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार निर्णय घेऊन काम केले त्यामुळे आमच्या राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असा दावाही बघेल यांनी यावेळी केला. भुपेश बघेल म्हणाले की, 'कोरोनाचा भारतात घुसण्यापासून रोखण्याची जबाबदारी केंद्र सरकारची होती. जर आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या सर्व प्रवाशांना कवारेन्टीन केले असते तर कोरोनाचा रोखता आले असते. दुसरीकडे मी राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आम्हाला यश आले.'

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार खासगी लॅबमध्ये कोरोनाची चाचणी  मोफत व्हायला पाहिजे तसेच याचा खर्च केंद्र सरकारने उचलला पाहिजे. तसेच केंद्र सरकारने जनधन खात्यात 500 ऐवजी 750 रुपये जमा केले पाहिजेत तसेच सर्व तीन हप्ते एकाच वेळी पाठवले पाहिजेत, अशी मागणी बघेल यांनी केली.

दरम्यान, छत्तीसगड सरकारने राहुल गांधींच्या सल्ल्यानुसार काम केले. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात आम्हाला यश आले. राज्यात 76 हजार लोकांना होम क्वारंटीन करण्यात आले आहे. राज्याची सीमा सील करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवरही सिलिंग करण्यात आले आहे. गावात आलेल्या प्रवासी मजुरांना गावाच्या सीमेबाहेर ठेवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChhattisgarhछत्तीसगडcongressकाँग्रेसPoliticsराजकारण