शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

CoronaVirus : 'आयुष्मान भारत'चे ऑफिस सील; एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा, 25 जण क्वारंटाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 20:25 IST

CoronaVirus : खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिल्लीतही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. दरम्यान,  दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील जीवन भारती इमारतीत असलेले 'आयुष्मान भारत'चे कार्यालय सील करण्यात आले आहे. 

कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहेत. आयुष्यमान भारतचे कार्यालय पाच दिवस आधीच सील करण्यात आले असून आता येत्या 24 एप्रिलला उघडण्यात येईल. 'आयुष्मान भारत'चे सीईओ डॉ. इंदु भूषण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. केंद्रीय मंत्रालयाने यासंबंधीची माहिती दिली आहे. देशात गेल्या 24 तासांत 1553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 17265 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

याशिवाय, देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 28 दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतcorona virusकोरोना वायरस बातम्या