शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

coronavirus:रेल्वे प्रवासात मास्क न वापरल्यास कारवाई होणार, विनामास्क प्रवाशांकडून एवढा दंड वसूल करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 16:23 IST

coronavirus News : कोरोनाचा फैलाव होत असताना दिलासादायक बाब म्हणजे सरकारने रेल्वे प्रवासावर निर्बंध आणलेले नाहीत. मात्र रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना आता कोरोनाबाबतच्या कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. (coronavirus in India) कोरोनाचा फैलाव होत असताना दिलासादायक बाब म्हणजे सरकारने रेल्वे प्रवासावर निर्बंध आणलेले नाहीत. मात्र रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना आता कोरोनाबाबतच्या कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे. (Indian Railway) रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आता अनिवार्य करण्यात आले असून, मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करून संबंधितांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरण्याचा हा नियम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने काही अन्य नियमही लागू केले आहेत. ( Action will be taken if the mask is not used in the train journey, 500 Rs. fine will be collected from the passengers without mask)

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत वर्मा यांनी सांगितले की, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे कोविड-१९ चा निगेटिव्ह रिपोर्ट असणे आवश्यक नाही. मात्र प्रवाशांना केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोनाबाबतच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि नियमांचे पालन करावे लागेल.  

कोरोनाच्या साधीमुळे स्वच्छतेचे निकष पाळण्यासाठी रेल्वेने प्रवासात मिळणाऱ्या भोजनाची सुविधा बंद केली होती. तसेच रेडी टू इट भोजन सुरू केले होते. तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लव्हज आदी वस्तू रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहेत. 

सध्या रेल्वे एकूण १४०२ स्पेशल ट्रेन चालवत आहे. एकूण ५३८१ उपनगरीय लोकल आणि ८३० पँसेंजर ट्रेन भारतीय रेल्वेकडून चालवल्या जात आहेत. त्याशिवाय २८ स्पेशल क्लोन ट्रेन पण चालवल्या जात आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वे