शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Coronavirus: कामगारांना घरभाड्यासाठी त्रास देणाऱ्या घरमालकांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 14:52 IST

देशातील सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर गरजुंना जेवन आणि राहण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेट करावे, अशी सूचना करण्यात आली.

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हारसर बधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशभरात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे प्रवास करण्यास बंदी असताना देखील परराज्यातील कामगार स्थलांतर करत आहे. स्थलांतर करणाऱ्या कामगारांसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

लॉकडाउनचे उल्लंघन करून स्थलांतर करणाऱ्यांना किमान १४ दिवस वेगळ अर्थात विलगीकरणात ठेवावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. देशातील सर्व राज्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. देशभरात सध्या कामगार मोठ्या संख्येने स्थलांतर करत आहेत.

देशातील सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर गरजुंना जेवन आणि राहण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेट करावे, अशी सूचना करण्यात आली.

दरम्यान राहण्याची आणि अन्न धान्याची व्यवस्था नसल्यामुळे कामगार स्थलांतर करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले की, कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा, त्यात कपात करू नये. तसेच कोणत्याही कामगाराला या स्थितीत घराचे भाडे मागू नये. जे लोक विद्यार्थ्यांना आणि कामगारांना घर रिकामे करण्यास सांगतील, अशा घरमालकाविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.  

देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजूर कुटुंबीयांसह स्थलांतर करत आहेत. या कामगारांसाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहेत.तरी देखील कामगार स्थलांतर करत आहेत. त्यामुळे दिल्ली, जयपूर अशा शहरातून मोठ्या प्रमाणात कामगार स्थलांतर करत आहेत.