शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

Coronavirus: कामगारांना घरभाड्यासाठी त्रास देणाऱ्या घरमालकांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 14:52 IST

देशातील सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर गरजुंना जेवन आणि राहण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेट करावे, अशी सूचना करण्यात आली.

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हारसर बधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशभरात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे प्रवास करण्यास बंदी असताना देखील परराज्यातील कामगार स्थलांतर करत आहे. स्थलांतर करणाऱ्या कामगारांसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

लॉकडाउनचे उल्लंघन करून स्थलांतर करणाऱ्यांना किमान १४ दिवस वेगळ अर्थात विलगीकरणात ठेवावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. देशातील सर्व राज्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. देशभरात सध्या कामगार मोठ्या संख्येने स्थलांतर करत आहेत.

देशातील सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर गरजुंना जेवन आणि राहण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेट करावे, अशी सूचना करण्यात आली.

दरम्यान राहण्याची आणि अन्न धान्याची व्यवस्था नसल्यामुळे कामगार स्थलांतर करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले की, कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा, त्यात कपात करू नये. तसेच कोणत्याही कामगाराला या स्थितीत घराचे भाडे मागू नये. जे लोक विद्यार्थ्यांना आणि कामगारांना घर रिकामे करण्यास सांगतील, अशा घरमालकाविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.  

देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजूर कुटुंबीयांसह स्थलांतर करत आहेत. या कामगारांसाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहेत.तरी देखील कामगार स्थलांतर करत आहेत. त्यामुळे दिल्ली, जयपूर अशा शहरातून मोठ्या प्रमाणात कामगार स्थलांतर करत आहेत.