शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Coronavirus: कामगारांना घरभाड्यासाठी त्रास देणाऱ्या घरमालकांवर होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 14:52 IST

देशातील सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर गरजुंना जेवन आणि राहण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेट करावे, अशी सूचना करण्यात आली.

नवी दिल्ली - देशात कोरोना व्हारसर बधित रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशभरात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. मात्र यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे प्रवास करण्यास बंदी असताना देखील परराज्यातील कामगार स्थलांतर करत आहे. स्थलांतर करणाऱ्या कामगारांसंदर्भात केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

लॉकडाउनचे उल्लंघन करून स्थलांतर करणाऱ्यांना किमान १४ दिवस वेगळ अर्थात विलगीकरणात ठेवावे, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. देशातील सर्व राज्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन आणि आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. देशभरात सध्या कामगार मोठ्या संख्येने स्थलांतर करत आहेत.

देशातील सर्व राज्य सरकारांना आपापल्या राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. तर गरजुंना जेवन आणि राहण्याची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना १४ दिवस आयसोलेट करावे, अशी सूचना करण्यात आली.

दरम्यान राहण्याची आणि अन्न धान्याची व्यवस्था नसल्यामुळे कामगार स्थलांतर करत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्पष्ट निर्देश दिले की, कामगारांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळावा, त्यात कपात करू नये. तसेच कोणत्याही कामगाराला या स्थितीत घराचे भाडे मागू नये. जे लोक विद्यार्थ्यांना आणि कामगारांना घर रिकामे करण्यास सांगतील, अशा घरमालकाविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.  

देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कामगार आणि मजूर कुटुंबीयांसह स्थलांतर करत आहेत. या कामगारांसाठी सर्व सुविधा पुरविण्यात येणार असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहेत.तरी देखील कामगार स्थलांतर करत आहेत. त्यामुळे दिल्ली, जयपूर अशा शहरातून मोठ्या प्रमाणात कामगार स्थलांतर करत आहेत.