शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

coronavirus: देशभरात एका दिवसात ८३,८८३ नवे रुग्ण, बाधित ३८ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 06:15 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ८३,८८३ नवे रुग्ण आढळून आले असून, हा आजवरचा उच्चांक आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७ टक्क्यांहून अधिक असून, अशा व्यक्तींची संख्या २९ लाखांहून जास्त झाली आहे.कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३८,५३,४०६ झाली असून, बरे झालेल्यांची संख्या २९,७०,४९२ इतकी आहे. या आजारामुळे आणखी १,०४३ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या ६७,३७६ झाली आहे. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकापेक्षा अधिक व्याधी जडलेल्या होत्या.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे. देशात दररोज होणाºया कोरोना चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ, रुग्णांना त्वरित मिळणारे वैद्यकीय उपचार यामुळे या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.एका दिवसात ११ लाख ७२ हजार कोरोना चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबर रोजी देशामध्ये ११,७२,१७९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील संख्येचा हा उच्चांक आहे. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,५५,०९,३८० झाली आहे. दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने राखले होते. ते याआधीही दोन-तीनदा गाठले होते; पण आता निर्धारित लक्ष्यापेक्षा आणखी एक लाख चाचण्या अधिक करून सरस कामगिरी करण्यात आली आहे.8,15,538 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या २१.१६ टक्के इतकी आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा आकडा ७ आॅगस्ट रोजी, तर ३० लाखांचा आकडा २३ आॅगस्ट रोजी ओलांडला होता.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,५१६, कर्नाटकमध्ये ५,९५०, दिल्लीत ४,४८१, आंध्र प्रदेशमध्ये ४,१२५, उत्तर प्रदेशमध्ये ३,६१६, पश्चिम बंगालमध्ये ३,३३९, गुजरातमध्ये ३,०४६, पंजाबमध्ये १,६१८ इतकी आहे.५ राज्यांत कोरोनाचे ६२% रुग्ण, महाराष्टÑ पहिल्या, तर आंध्र दुसºया स्थानीदेशात कोरोनाच्या चाचण्या वाढण्याबरोबरच संक्रमणही घटत आहे. कोरोनाच्या काळात जीवन महत्त्वपूर्ण आहे व जीवनासाठी उदरनिर्वाह महत्त्वाचा आहे. म्हणूनच राज्यांशी विचारविनिमय केल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू केले जात आहेत. २४ तासांत ११.७२ लाख विक्रमी चाचण्या करण्यात आल्या. यातील पॉझिटिव्हिटी दर ७.२० टक्के आहे. एका दिवसात सर्वाधिक ६८,५८४ कोरोना रुग्ण संक्रमित झाले. याबरोबरच कोरोनातून बरे होणारांची संख्या २९,७०,४९२ झाली आहे. बरे होणारांचे प्रमाण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा ३.६ पट जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सचिव राजेश भूषण यांनी दिली.दररोज ९.५ लाख चाचण्या केल्या जात आहेत. शास्त्रज्ञ रात्रंदिवस लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत व चाचण्या घेत आहेत. मंत्रालयाकडून वित्त, व्यवस्थापन, कोल्ड चेन, परिवहन व लसीच्या संरक्षणाची व्यवस्था होत आहे. पाच राज्यांत कोरोनाचे ६२ टक्के रुग्ण आहेत. उर्वरित ३७.६६ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अन्य राज्यांत आहेत.महाराष्टÑात सर्वाधिक २४.७७ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश १२.६४ टक्के, कर्नाटक ११.५८, उत्तर प्रदेश ६.९२ व दिल्लीत ६.४२ टक्के रुग्ण आहेत. पाच राज्यांत मागील तीन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या महाराष्टÑात ६.८ टक्के, तामिळनाडूत २३.९ टक्के, कर्नाटकात १६.१ टक्के, आंध्रात १३.७ टक्के व उत्तर प्रदेशात १७.१ टक्के कमी झाली आहे. देशातील ७० टक्के मृत्यू याच राज्यात झालेले आहेत. महाराष्टÑात ११.५ टक्के, आंध्रात ४.५ व तामिळनाडूत १८.२ टक्के मृत्यूदरात घट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य