शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

coronavirus: देशभरात एका दिवसात ८३,८८३ नवे रुग्ण, बाधित ३८ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 06:15 IST

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ८३,८८३ नवे रुग्ण आढळून आले असून, हा आजवरचा उच्चांक आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ७७ टक्क्यांहून अधिक असून, अशा व्यक्तींची संख्या २९ लाखांहून जास्त झाली आहे.कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३८,५३,४०६ झाली असून, बरे झालेल्यांची संख्या २९,७०,४९२ इतकी आहे. या आजारामुळे आणखी १,०४३ जण मरण पावले असून, त्यामुळे बळींची एकूण संख्या ६७,३७६ झाली आहे. बळी गेलेल्यांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक लोकांना एकापेक्षा अधिक व्याधी जडलेल्या होत्या.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.७५ टक्के इतका कमी राखण्यात सरकारला यश आले आहे. हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर आहे. देशात दररोज होणाºया कोरोना चाचण्यांच्या संख्येत झालेली वाढ, रुग्णांना त्वरित मिळणारे वैद्यकीय उपचार यामुळे या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.एका दिवसात ११ लाख ७२ हजार कोरोना चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार २ सप्टेंबर रोजी देशामध्ये ११,७२,१७९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. कोरोना चाचण्यांचा एका दिवसातील संख्येचा हा उच्चांक आहे. कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता ४,५५,०९,३८० झाली आहे. दररोज दहा लाख कोरोना चाचण्या करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने राखले होते. ते याआधीही दोन-तीनदा गाठले होते; पण आता निर्धारित लक्ष्यापेक्षा आणखी एक लाख चाचण्या अधिक करून सरस कामगिरी करण्यात आली आहे.8,15,538 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असून, ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या २१.१६ टक्के इतकी आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा आकडा ७ आॅगस्ट रोजी, तर ३० लाखांचा आकडा २३ आॅगस्ट रोजी ओलांडला होता.कोरोना बळींची संख्या तामिळनाडूमध्ये ७,५१६, कर्नाटकमध्ये ५,९५०, दिल्लीत ४,४८१, आंध्र प्रदेशमध्ये ४,१२५, उत्तर प्रदेशमध्ये ३,६१६, पश्चिम बंगालमध्ये ३,३३९, गुजरातमध्ये ३,०४६, पंजाबमध्ये १,६१८ इतकी आहे.५ राज्यांत कोरोनाचे ६२% रुग्ण, महाराष्टÑ पहिल्या, तर आंध्र दुसºया स्थानीदेशात कोरोनाच्या चाचण्या वाढण्याबरोबरच संक्रमणही घटत आहे. कोरोनाच्या काळात जीवन महत्त्वपूर्ण आहे व जीवनासाठी उदरनिर्वाह महत्त्वाचा आहे. म्हणूनच राज्यांशी विचारविनिमय केल्यानंतर आर्थिक व्यवहार सुरू केले जात आहेत. २४ तासांत ११.७२ लाख विक्रमी चाचण्या करण्यात आल्या. यातील पॉझिटिव्हिटी दर ७.२० टक्के आहे. एका दिवसात सर्वाधिक ६८,५८४ कोरोना रुग्ण संक्रमित झाले. याबरोबरच कोरोनातून बरे होणारांची संख्या २९,७०,४९२ झाली आहे. बरे होणारांचे प्रमाण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा ३.६ पट जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सचिव राजेश भूषण यांनी दिली.दररोज ९.५ लाख चाचण्या केल्या जात आहेत. शास्त्रज्ञ रात्रंदिवस लस तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत व चाचण्या घेत आहेत. मंत्रालयाकडून वित्त, व्यवस्थापन, कोल्ड चेन, परिवहन व लसीच्या संरक्षणाची व्यवस्था होत आहे. पाच राज्यांत कोरोनाचे ६२ टक्के रुग्ण आहेत. उर्वरित ३७.६६ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण अन्य राज्यांत आहेत.महाराष्टÑात सर्वाधिक २४.७७ टक्के अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश १२.६४ टक्के, कर्नाटक ११.५८, उत्तर प्रदेश ६.९२ व दिल्लीत ६.४२ टक्के रुग्ण आहेत. पाच राज्यांत मागील तीन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या महाराष्टÑात ६.८ टक्के, तामिळनाडूत २३.९ टक्के, कर्नाटकात १६.१ टक्के, आंध्रात १३.७ टक्के व उत्तर प्रदेशात १७.१ टक्के कमी झाली आहे. देशातील ७० टक्के मृत्यू याच राज्यात झालेले आहेत. महाराष्टÑात ११.५ टक्के, आंध्रात ४.५ व तामिळनाडूत १८.२ टक्के मृत्यूदरात घट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य