शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: ५० देशांत ६,३०० भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 05:28 IST

विदेशांमधील सुमारे ९० टक्के कोरोनाबाधित भारतीय नागरिक सिंगापूर व आखाती देशांमध्ये आहेत.

नवी दिल्ली : जगभरातील ५० देशांमध्ये सुमारे ६,३०० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे व त्यापैकी ४० जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. विदेशांमधील कोरोनाबाधित भारतीय नागरिकाची संख्या १६ एप्रिल रोजी ३३६ होती. त्यानंतरच्या आठ−दहा दिवसांत ही संख्या दुपटीने वाढली. याच काळात मृत्यूसंख्याही २५ वरून ४० वर गेली. विदेशांमधील सुमारे ९० टक्के कोरोनाबाधित भारतीय नागरिक सिंगापूर व आखाती देशांमध्ये आहेत. सिंगापूरमध्ये प्रामुख्याने डॉमिटरीमध्ये राहणाऱ्या एक हजार भारतीय कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुवेत, बहारिन, ओमान, कतार, सौदी अरबस्तान व संयुक्त अरब अमिरात यासारख्या आखाती देशांमध्ये एक हजार भारतीयांना संसर्ग झाला आहे. इराणमध्येही कोरोना संसर्ग झालेल्या भारतीयांची संख्या शंभरहून अधिक आहे. या सर्व भारतीयांना योग्य उपचार व अन्य सुविधा मिळतील याकडे त्या− त्या देशांमधील भारतीय वकिलाती लक्ष देत आहेत. परंतु भारतातच कोरोनाला परिणामकारकपणे आळा घालणे अद्याप शक्य झालेले नसल्याने परदेशातील या कोरोनाग्रस्त भारतीयांना मायदेशी परत आणणे के व्हा शक्य होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. तीन भारतीयांचे मृतदेह दिल्लीहून परत पाठविले.आबुधाबी : कोरोनाखेरीज अन्य आजारांनी मृत्यू पावलेल्या तीन भारतीय नागरिकांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींच्या सरकारने नवी दिल्लीला पाठविले असता ते तेथून परत पाठविण्यात आल्याचे वृत्त ‘गल्फ न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. त्या वृत्तात त्या मृत भारतीयांची नावे कमलेश भट, संजीव कुमार व जगसीर सिंग अशी देण्यात आली. कमलेश यांचे १७ एप्रिल रोजी तर अन्य दोघांचे १३ एप्रिल रोजी निधन झाले होते.गल्फ न्यूज’ने यासंदर्भात भारताचे येथील राजदूत पवन कपूर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा कपूर म्हणाले की, ही घटना नक्कीच धक्कादायक असून, सुन्न करणारी आहे. आम्ही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भारतीयांचे मृतदेह मायदेशी पाठवत नाही. तरी हे मृतदेह परत का पाठविले हे नक्की कळत नाही. आम्ही नेमके कशामुळे असे झाले याची माहिती घेत आहोत. कदाचित कोरोनामुळे विमानतळांवर लागू असलेल्या निर्बंधांमुळे असे झाले असावे.>इस्कॉनच्या ३१ जणांना कोरोनाची बाधाबांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील इस्कॉनच्या ३१ सदस्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने या जीवघेण्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी इस्कॉन मंदिर पूर्णत: बंद केले आहे. बांगलादेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास ५ हजारअसून, आतापर्यंत १४० जणांचा या रोगाने मृत्यू झाला आहे. ढाकामधील स्वामीबाग परिसरात इस्कॉन आश्रम आहे. येथील ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, असे गेंदरिया पोलीस ठाण्याचे अधिक री सजूमियाँ यांनी ढाक ट्रिब्युनच्या हवाल्याने सांगितले. कोरोनाबाधित इस्कॉनच्या सदस्यांना उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सर्व रस्ते बंद केले आहे. बांगलादेशात ८ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, तेव्हापासून हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या