शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

"कोरोना नैसर्गिक नव्हता, तो जैविक युद्धाचा कट होता", श्री श्री रविशंकर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 18:58 IST

कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून ही महामारी काही देशांचे षड्यंत्र आहे. ते एक जैविक युद्ध होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

नवी दिल्ली : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी कोरोना व्हायरसबाबत मोठे विधान केले आहे. कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून ही महामारी काही देशांचे षड्यंत्र आहे. ते एक जैविक युद्ध होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. सोमवारी येथे महाराष्ट्रातील एका धार्मिक कार्यक्रमाला संबोधित करताना रविशंकर म्हणाले की, हे बरोबर सिद्ध झाले आहे, कारण मोठे देश आता म्हणत आहेत की कोरोनाव्हायरसविरूद्ध लस फारशी उपयुक्त ठरत नाहीत.

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसशी लढा द्यावा लागला. लोकांना दोन वर्षे घरातच राहावे लागले. कोरोनाच्या प्रभावावर मी त्यावेळी म्हणालो होतो की, हा आजार नैसर्गिक नाही. हे काही देश आणि लोकांचे षड्यंत्र आहे, हे जैविक युद्ध आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, माझ्या शिष्यांनी देखील मला असे न बोलण्याचा सल्ला दिला होता, कारण यामुळे वाद निर्माण होईल. पण, मी जे म्हणत होतो ते आता सिद्ध झाले आहे, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, जे मोठे देश कोरोना व्हायरसची लस बनवत आहेत, ते म्हणत आहेत की ही लस पाहिजे तितकी प्रभावी नाही. त्यामुळे संसर्गाचा प्रसार थांबत नाही. देशाची योग आणि आयुर्वेदावर श्रद्धा असायला हवी, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, हर्बल आणि आयुर्वेदिक औषधे वापरली जावीत, असे मला वाटले आणि त्यासाठी एनएओक्यू 19 तयार केली आणि 14 हॉस्पिटलमध्ये त्याची चाचणी करण्यात आली, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

याशिवाय, एनएओक्यू 19 कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी औषध म्हणून काम करत आहे. हे परदेशातील अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये पाठवण्यात आले आणि लोकांना समजले की, हे औषध कोरोना व्हायरसला रोखण्यात यशस्वी ठरेल. आपल्या देशाच्या योग आणि आयुर्वेदावर आपली श्रद्धा असली पाहिजे, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या