शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोना नैसर्गिक नव्हता, तो जैविक युद्धाचा कट होता", श्री श्री रविशंकर यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 18:58 IST

कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून ही महामारी काही देशांचे षड्यंत्र आहे. ते एक जैविक युद्ध होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

नवी दिल्ली : अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी कोरोना व्हायरसबाबत मोठे विधान केले आहे. कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून ही महामारी काही देशांचे षड्यंत्र आहे. ते एक जैविक युद्ध होते, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. सोमवारी येथे महाराष्ट्रातील एका धार्मिक कार्यक्रमाला संबोधित करताना रविशंकर म्हणाले की, हे बरोबर सिद्ध झाले आहे, कारण मोठे देश आता म्हणत आहेत की कोरोनाव्हायरसविरूद्ध लस फारशी उपयुक्त ठरत नाहीत.

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसशी लढा द्यावा लागला. लोकांना दोन वर्षे घरातच राहावे लागले. कोरोनाच्या प्रभावावर मी त्यावेळी म्हणालो होतो की, हा आजार नैसर्गिक नाही. हे काही देश आणि लोकांचे षड्यंत्र आहे, हे जैविक युद्ध आहे, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, माझ्या शिष्यांनी देखील मला असे न बोलण्याचा सल्ला दिला होता, कारण यामुळे वाद निर्माण होईल. पण, मी जे म्हणत होतो ते आता सिद्ध झाले आहे, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, जे मोठे देश कोरोना व्हायरसची लस बनवत आहेत, ते म्हणत आहेत की ही लस पाहिजे तितकी प्रभावी नाही. त्यामुळे संसर्गाचा प्रसार थांबत नाही. देशाची योग आणि आयुर्वेदावर श्रद्धा असायला हवी, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. तसेच, हर्बल आणि आयुर्वेदिक औषधे वापरली जावीत, असे मला वाटले आणि त्यासाठी एनएओक्यू 19 तयार केली आणि 14 हॉस्पिटलमध्ये त्याची चाचणी करण्यात आली, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

याशिवाय, एनएओक्यू 19 कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी औषध म्हणून काम करत आहे. हे परदेशातील अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये पाठवण्यात आले आणि लोकांना समजले की, हे औषध कोरोना व्हायरसला रोखण्यात यशस्वी ठरेल. आपल्या देशाच्या योग आणि आयुर्वेदावर आपली श्रद्धा असली पाहिजे, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या