शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

CoronaVirus News: भारतात कोरोनामुळे तब्बल ४७ लाख जणांचा मृत्यू; WHOच्या अहवालानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 23:17 IST

CoronaVirus News: जगभरात कोरोनाचे १.५ कोटी बळी; पैकी ४७ लाख भारतातील; WHO कडून अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली: कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दलचा एक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतात कोरोनामुळे ४७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना बळींची एकूण संख्या ५ लाखांपेक्षा थोडी अधिक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे.

भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्या तांत्रिक प्रारुपाच्या मदतीनं जागतिक आरोग्य संघटनेनं आकडेवारी गोळा केली, ते प्रारुपचं योग्य नसल्याचा भारत सरकारचा दावा आहे. भारतानं आक्षेप नोंदवल्यानंतरही जागतिक आरोग्य संघटनेनं जुन्या प्रारुपाच्या माध्यमातून मृतांचे आकडे जाहीर केल्याचं सरकारनं निवेदनात म्हटलं आहे. भारतानं चिंता व्यक्त करूनही जागतिक आरोग्य संघटनेनं दुर्लक्ष केल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेले आकडे केवळ १७ राज्यांचे आहेत. ती राज्यं कोणती तेदेखील जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलेलं नाही. हे आकडे कधी गोळा केले, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं गणिती प्रारुपाच्या माध्यमातून आकडेवारी गोळा केली. मात्र भारतानं नुकताच विश्वसनीय CSR अहवाल जारी केलेला आहे, असं सरकारनं म्हटलं आहे. 

दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगभरात गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दीड कोटी लोकांचा जीव गेला. यापैकी ४७ लाख लोक भारतातील आहेत. हे आकडे गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयियस यांनी म्हटलं आहे. आरोग्यविषयक आणीबाणींचा सामना करण्यासाठी सगळ्याच देशांनी आणखी तयार करायला हवी. भविष्यातील संकटांसाठी अधिक तरतूद करायला हवी, असं घेब्रेयियस म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना