शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

CoronaVirus News: भारतात कोरोनामुळे तब्बल ४७ लाख जणांचा मृत्यू; WHOच्या अहवालानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 23:17 IST

CoronaVirus News: जगभरात कोरोनाचे १.५ कोटी बळी; पैकी ४७ लाख भारतातील; WHO कडून अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली: कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दलचा एक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतात कोरोनामुळे ४७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना बळींची एकूण संख्या ५ लाखांपेक्षा थोडी अधिक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे.

भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्या तांत्रिक प्रारुपाच्या मदतीनं जागतिक आरोग्य संघटनेनं आकडेवारी गोळा केली, ते प्रारुपचं योग्य नसल्याचा भारत सरकारचा दावा आहे. भारतानं आक्षेप नोंदवल्यानंतरही जागतिक आरोग्य संघटनेनं जुन्या प्रारुपाच्या माध्यमातून मृतांचे आकडे जाहीर केल्याचं सरकारनं निवेदनात म्हटलं आहे. भारतानं चिंता व्यक्त करूनही जागतिक आरोग्य संघटनेनं दुर्लक्ष केल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेले आकडे केवळ १७ राज्यांचे आहेत. ती राज्यं कोणती तेदेखील जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलेलं नाही. हे आकडे कधी गोळा केले, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं गणिती प्रारुपाच्या माध्यमातून आकडेवारी गोळा केली. मात्र भारतानं नुकताच विश्वसनीय CSR अहवाल जारी केलेला आहे, असं सरकारनं म्हटलं आहे. 

दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगभरात गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दीड कोटी लोकांचा जीव गेला. यापैकी ४७ लाख लोक भारतातील आहेत. हे आकडे गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयियस यांनी म्हटलं आहे. आरोग्यविषयक आणीबाणींचा सामना करण्यासाठी सगळ्याच देशांनी आणखी तयार करायला हवी. भविष्यातील संकटांसाठी अधिक तरतूद करायला हवी, असं घेब्रेयियस म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना