शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

CoronaVirus News: भारतात कोरोनामुळे तब्बल ४७ लाख जणांचा मृत्यू; WHOच्या अहवालानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 23:17 IST

CoronaVirus News: जगभरात कोरोनाचे १.५ कोटी बळी; पैकी ४७ लाख भारतातील; WHO कडून अहवाल प्रसिद्ध

नवी दिल्ली: कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दलचा एक अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार भारतात कोरोनामुळे ४७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारत सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना बळींची एकूण संख्या ५ लाखांपेक्षा थोडी अधिक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर भारतानं आक्षेप नोंदवला आहे.

भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्या तांत्रिक प्रारुपाच्या मदतीनं जागतिक आरोग्य संघटनेनं आकडेवारी गोळा केली, ते प्रारुपचं योग्य नसल्याचा भारत सरकारचा दावा आहे. भारतानं आक्षेप नोंदवल्यानंतरही जागतिक आरोग्य संघटनेनं जुन्या प्रारुपाच्या माध्यमातून मृतांचे आकडे जाहीर केल्याचं सरकारनं निवेदनात म्हटलं आहे. भारतानं चिंता व्यक्त करूनही जागतिक आरोग्य संघटनेनं दुर्लक्ष केल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलेले आकडे केवळ १७ राज्यांचे आहेत. ती राज्यं कोणती तेदेखील जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलेलं नाही. हे आकडे कधी गोळा केले, याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं गणिती प्रारुपाच्या माध्यमातून आकडेवारी गोळा केली. मात्र भारतानं नुकताच विश्वसनीय CSR अहवाल जारी केलेला आहे, असं सरकारनं म्हटलं आहे. 

दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगभरात गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे दीड कोटी लोकांचा जीव गेला. यापैकी ४७ लाख लोक भारतातील आहेत. हे आकडे गंभीर असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रेयियस यांनी म्हटलं आहे. आरोग्यविषयक आणीबाणींचा सामना करण्यासाठी सगळ्याच देशांनी आणखी तयार करायला हवी. भविष्यातील संकटांसाठी अधिक तरतूद करायला हवी, असं घेब्रेयियस म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना