शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोना प्राणघातक नाही; पण आहे धूर्त, होतो वेगाने संसर्ग : डॉ. अरोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 08:29 IST

Corona Virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईत भूमिका पार पाडणाऱ्या जीनोमिक्स कंसोर्टियमची (इनसाकॉग) जबाबदारी मोदी सरकारने डॉ. एन. के. अरोरा यांना सोपविली आहे.

राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समूहाच्या अध्यक्षांशी संवाद : महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी केंद्र सरकारची दीर्घकालीन योजना

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भूमिका पार पाडणाऱ्या जीनोमिक्स कंसोर्टियमची (इनसाकॉग) जबाबदारी मोदी सरकारने डॉ. एन. के. अरोरा यांना सोपविली आहे. राष्ट्रीय लसीकरण सल्लागार समूहाचे (एनटीएजीआय) अध्यक्ष आणि वरिष्ठ डॉक्टर अरोरा यांच्याशी ‘लोकमत’चे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांनी विशेष चर्चा केली. 

महाराष्ट्रात २०१० मध्ये संसर्ग झाला. त्यानंतर २०१५ मध्ये स्वाइन फ्लू आला आणि आता महाराष्ट्रच सर्वाधिक संसर्ग असलेले राज्य आहे, याचे कारण काय? 

- सार्स वन आणि स्वाइन फ्लू हे कोरोनापेक्षा अधिक घातक आजार होते. हा संसर्गही कोरोनासारखा बाहेरून आला. कारण, व्यवसायानिमित्त महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात खूप लोक विदेशातून येतात. त्यामुळे तिथे संसर्ग अधिक झाला. केरळातही खूप लोक बाहेरून येतात; पण येथे बहुतांश लोक आखाती देशातून येतात. त्या देशात संसर्ग कमी होता, म्हणून संसर्ग वाढला नाही. दिल्लीतही बरेच लोक बाहेरून येतात; पण तेव्हा संसर्ग कमी होता. मात्र, यापूर्वी दोन्ही साथींत मृत्यूदर ५० टक्क्यांपर्यंत होता. त्यावेळी मृत्यूदर अधिक होता त्यामुळे संसर्गाचा दर कमी होता; पण कोरोनाच्या काळात हे नेमके उलटे झाले. 

असे सांगितले जात होते की, दुसऱ्या लाटेचा परिणाम १०० दिवस राहील; पण आता १२० दिवस होत आले आहेत. -हे खरे आहे की, ही लाट आता १२० दिवसांच्या आसपास समाप्त होईल. ३० जूनपर्यंत समाप्त होण्याची आशा आहे. ज्या वेगाने संसर्ग झाला तितक्या वेगाने कमीही होतो आहे. 

महाराष्ट्रात रुग्णवाढीचा वेग कमी होता आणि आता कमी होण्याचे प्रमाणही कमी आहे. याचे विशेष कारण काय? - महाराष्ट्रात संसर्ग होण्याचे प्रमाण जवळपास ४ ते ५ टक्के होते. आता ३ टक्क्यांच्या दराने घसरण होत आहे. देशात ६ ते ७ टक्क्यांच्या दराने संसर्ग वाढला होता. तो आता ४ ते ५ टक्क्यांच्या दराने घसरत आहे. देशाच्या आकड्यांप्रमाणेच महाराष्ट्राचेही आकडे आहेत; पण महाराष्ट्रावर आमचे विशेष लक्ष आहे. 

याचे विशेष कारण काय आहे? - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. एखाद्या राज्यात हा आकडा थोडाफार कमी-जास्त असू शकतो. मात्र, सरासरी हीच आहे. मृत्यूदर कमी असल्याने विषाणू अधिक दिवस शरीरात राहतो आणि अधिकाधिक लोकांना याचा संसर्ग होतो. 

म्हणजे हा प्राणघातक नाही? - कारण, हा धूर्त आहे. खट्याळ, खोडकर विषाणू आहे. हा प्राणघातक नाही. याचा संसर्ग अधिक होतो; पण प्राणहानी कमी आहे. मात्र, सार्स वन आणि स्वाइन फ्लू मारक विषाणू होते. जे याच्याजवळ जात होते, त्याला संसर्ग होत होता. दुबळ्या व्यक्तींना मारतो. ज्यांना पूर्वीपासूनच काही समस्या आहे, अशा लोकांचा मृत्यू झाला. अतिशय कमी प्रकरणे अशी आहेत, जी याला अपवाद आहेत. 

याचा अर्थ हा मुख्यत: महाराष्ट्र आणि दिल्लीत आला?  - ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वाहतूक आहे, त्या ठिकाणी याचा परिणाम सर्वात आधी पाहावयास मिळाला. आमच्या अध्ययनातही महाराष्ट्र आणि दिल्ली याची मुख्य ठिकाणे दिसून आली आणि काही प्रमाणात केरळही. केरळात बरेच लोक आखाती देशातूनही येतात. येथे याचा संसर्ग कमी होता. आमच्या अध्ययनात असे दिसून आले की, दिल्लीतही याचा संसर्ग तितका झाला नाही ज्या वेगाने महाराष्ट्रात वाढला, विशेषत: पुणे आणि अमरावतीमध्ये. 

महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी काही विशेष योजना तयार होत आहे का? - मी येथे हे सांगू इच्छितो की, डिसेंबरमध्येच यावर काम सुरू झाले होते. यात पूर्ण देशात दहा विभाग बनविण्यात आले. दहा उच्चस्तरीय लॅब बनविण्यात आल्या. भविष्यात कोणत्याही स्थानिक संसर्गाची लवकर चाचणी करता येईल. त्यानंतर त्या भागात तत्काळ लॉकडाऊन करण्यात येईल. जेणेकरून, संसर्ग वाढू नये. भविष्यातील कोणत्याही प्रकारच्या संसर्गासाठी पुढील २५ वर्षांची योजना तयार करण्यात आली आहे.

असे उपाय महाराष्ट्र आणि दिल्लीत अगोदरच का नाही केले?- केवळ हास्य. 

हे कोण करणार? - हे सर्व काम इंसोकॉगअंतर्गत केले जाणार आहे. 

याचे नेतृत्व थेट आपण करत आहात? - सरकारने माझ्यावर या टास्क फोर्सची जबाबदारी दिली आहे. इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या उत्परिवर्तनाची चर्चा आहे. फ्रान्स आणि जर्मनीत यावर इशाराही जारी केला आहे. दोन्ही देशांनी इंग्लंडसोबतचे परिवहन थांबविले आहे. आमचे त्यावरही लक्ष आहे; पण आतापर्यंत भारतात असे काही दिसून आले नाही. व्हिएतनाममधूनही असे वृत्त आहे. असे नवे प्रकार येत राहतील. त्यावर आमचे लक्ष असेल. आता कोणताही विषाणू आमच्या नजरेतून सुटू शकणार नाही. 

भले तो कितीही बदमाश आणि धूर्त असला तरी...- होय, आशा तर हीच आहे. 

डब्ल्यूएचओचे डॉ. नबैरो यांनी भारताच्या लसीकरण कार्यक्रमाबाबत म्हटले आहे की, अगोदर जास्त जोखीम असलेल्या वर्गाला लस द्यायला हवी होती; पण ते सर्वांसाठी खुले करण्यात आले. - आम्ही सप्टेंबर २०२० मध्येच ठरविले होते की, लसीकरण ४५ ते ५० पेक्षा अधिक वयोगटासाठी प्रथम करायला हवे. कारण, आमच्याकडे पहिले सहा महिने मोठ्या प्रमाणात डोस असणार नाहीत; पण राज्यांकडून मागणी करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. आता अनेक राज्यांना हे कळून चुकले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस