शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Corona Vaccine : बापरे! कोरोना लस दिल्यानंतर 'या' ठिकाणी 12 मुलं पडली आजारी, डॉक्टरांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 14:47 IST

Corona Vaccine : रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. देशात आणि जगात कोरोना व्हायरसविरूद्ध लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याअंतर्गत 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही कोरोनाची लस दिली जात आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सतना येथे 12 मुलं कोरोना लस घेतल्यानंतर अचानक आजारी पडले आहेत. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती ठिक असल्याचं म्हटलं जात आहे. 

कोरोनाची लस दिल्यानंतर घाबरून ही सर्व मुले आजारी पडल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी अशोक अवधीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांना लस दिली जात होती, परंतु लस दिल्यानंतर ते सर्व भीतीमुळे आजारी पडले. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला, भारतात कोरोना लसीकरण मोहीम वाढवत, 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण देखील सुरू करण्यात आले आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल ई कंपनीने विकसित केलेली कॉर्बेवॅक्स लस या वयोगटातील मुलांना दिली जात आहे. दुसरीकडे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत 12-14 वयोगटातील एक कोटीहून अधिक मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण 16 मार्चपासून सुरू झाले. त्यांना कॉर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे, ज्याचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

कोरोनात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी गमावले आई-बाबा; सरकारी आकडेवारीची पोलखोल

कोरोना काळात गुजरातमध्ये 20,000 मुलांनी आई किंवा बाबा यामधील एकाला गमावलं आहे. सरकारी आकडेवारीची आता पोलखोल झाली आहे.आईवडील गमावलेल्या मुलांचे आकडे गुजरात विधानसभेमध्ये आता समोर आले आहेत. त्यामुळे सरकारी कागदपत्रांमध्ये असलेल्या कोरोना मृतांच्या आकडेवारीची पोलखोल झाली आहे. आई आणि वडील हे दोन्ही गमावलेल्या लहान मुलांना दर महिना चार हजार रुपये तर पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा याआधी गुजरात सरकारने केली आहे. विधानसभेत जेव्हा हे आकडे समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला आहे.  गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2021 पर्यंत सरकारकडे 27 हजार 674 अर्ज हे मदतीसाठी आले आहेत. ज्यामधील 20,970 अर्ज हे स्वीकारण्यात आले आहेत. तर 3 हजार 665 अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. 3009 अर्जांवर सरकारचा निर्णय अद्याप बाकी आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMadhya Pradeshमध्य प्रदेश