शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Corona Vaccination: कोरोना लस घेतल्यानं देशात पहिल्या मृत्यूची नोंद; सरकारनं सांगितलं 'नेमकं' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:02 IST

Corona Vaccination: ५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान ६० लाख लोकांचं लसीकरण, पैकी एकाचा मृत्यू

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका असल्यानं लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. मात्र काही व्यक्तींकडून जाणीवपूर्वक लसीकरणाबद्दल अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे. याबद्दल सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे.काळजी घ्या! कोरोनाच्या नव्या रुपानं वाढवली चिंता; संशोधनातून समोर आला मोठा धोका

कोरोना लसीचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी सरकारनं नुकताच एक आढावा घेतला. ५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान लस घेतलेल्यांचा आढावा सरकारकडून घेण्यात आला. या कालावधीत लस घेतलेल्या लाखोंपैकी केवळ ३१ जणांच्या शरीरात ऍनाफिलेक्सिस तयार झाला. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे या मृत्यूचा संबंध कोरोना लसीच्या दुष्परिणामांशी जोडला जाऊ शकतो. मात्र लाखो व्यक्तींमध्ये एकाच व्यक्तीच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे.गुड न्यूज! तब्बल 75 दिवसांनी पहिल्यांदाच सुखावणारी आकडेवारी, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट

५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान देशात ६० लाख लोकांनी कोरोना लस घेतली. यातील २८ जणांचा मृत्यू झाला. मात्र यातील बहुतांश मृत्यूंना लस कारणीभूत नाही. नऊ जणांच्या मृत्यूमागचं कारण अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. लसीकरणाच्या दुष्परिणांचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं एक राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. 'देशात कोरोना लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे. लस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला ऍनाफिलेक्सिस रिऍक्शन झाली. देशात आतापर्यंत कोट्यवधी लोकांना कोरोना लस घेतली आहे. त्यातील मोजक्या लोकांवर गंभीर साईड इफेक्ट्स दिसले आहेत. केवळ ३१ व्यक्तींनाच ऍनाफिलेक्सिस रिऍक्शन झाली. यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर इतरांवर उपचार झाले,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस