शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

देशात झपाट्याने वाढताहेत कोरोनाचे रुग्ण; बळी ६ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 06:08 IST

एकूण संख्या २ लाख २० हजारांवर; ४८% बळी महाराष्ट्रातील

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २० हजारांपर्यंत पोहोचली असून, या आजाराला बळी पडलेल्यांची संख्या सहा हजारांपेक्षा अधिक झाली आहे.आतापर्यंत देशामध्ये दरदिवशी कोरोनाचे चार किंवा पाच हजार नवे रुग्ण आढळत होते. गेल्या १५ दिवसांत त्यात अधिक वाढ होत गेली आणि गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे ९ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले.

देशात बुधवारी कोरोनामुळे २६० हून अधिक लोकांचा बळी गेला. एकट्या महाराष्ट्रामध्ये १२२ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण बळींपैकी ४८ टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीमध्ये बुधवारी ५०, तर गुजरातमध्ये तीस जणांचा या साथीने बळी गेला. कोरोना रुग्णांपैकी १ लाखांहून अधिक लोक उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी आणखी १,५२३ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे तेथील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. दिल्लीत ६०० पेक्षा जास्त लोक बळी पडले आहेत.

दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या, त्यांची स्थिती व रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या आदी तपशील जाणून घेण्यासाठी दिल्ली कोरोना हे अ‍ॅप विकसित केले आहे. तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी २५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. महाराष्ट्रानंतर कोरोना रुग्णांचा २५ हजारांचा टप्पा करणारे तामिळनाडू हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. गुजरातमध्येही कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार झाला आहे.रेमडिसिव्हिरबद्दलच्या निर्णयाचे स्वागतप्रकृती चिंताजनक असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडिसिव्हिर या औषधाचा वापर करण्यास भारताने परवानगी दिली आहे. गिलिड सायन्सेस या कंपनीतर्फे हे औषध बनविण्यात येते. कोरोना रुग्णांवर केलेल्या चाचण्यांत रेमडिसिव्हिर औषधामुळे रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे निदर्शनास आले होते. रेमडिसिव्हिरचा समावेश केल्याने भारतात कोरोना प्रतिबंधक उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.77,793राज्यात कोरोना रुग्णमुंबई : राज्यात गुरुवारी दिवसभरात २ हजार ९३३ जणांना कोरोनाची बाधा झाली, तर दिवसभरात १२३ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ७७ हजार ७९३ झाली असून, बळींचा आकडा २ हजार ७१० झाला आहे. दिवसभरात १ हजार ३५२ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४३.२९ टक्के झाले असून, मृत्यूदर ३.४८ टक्के एवढा आहे.रशिया, भारतात वाढत आहेत रुग्णकोरोनाचे सर्वाधिक म्हणजे १९ लाखांहून अधिक रुग्ण अमेरिकेत असले तरी रशिया, भारत व इराणमध्ये आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जगात ६६ लाखांहून अधिक रुग्ण असले तरी त्यातील ३२ लाख बरे झाले आहेत आणि ३५ लाख ८५ हजार जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आतापर्यंत ३ लाख ८९ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १ लाख ९ हजार एकट्या अमेरिकेतील आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या