शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

निवडणूक झालेल्या राज्यांत काेराेनाचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:46 IST

पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेशात जोमाने रुग्णवाढ

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात देशभरात कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड संख्येने वाढ झाली. १ एप्रिल रोजी देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार होता. तो ३० एप्रिल रोजी ४ लाख एवढा झाला. या सगळ्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ज्या राज्यांमध्ये निवडणूक होती त्या राज्यांत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णवाढीचा सर्वाधिक वेग आसाममध्ये होता. 

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली, तर उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांसाठी प्रचार झाला. या कालावधीत या सर्व राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जोमाने वाढल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. आसाममध्ये १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ५८ होती. ३० एप्रिल रोजी ही संख्या ३,१९७ एवढी झाली. याचाच अर्थ एकट्या आसामात एक महिन्यात तब्बल ५४१२ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. याच कालावधीत पश्चिम बंगालमध्ये १२६६ टक्के, केरळ आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे १२२९ आणि १२२७ टक्के, तर तामि‌ळनाडू आणि पुदुच्चेरीत अनुक्रमे ५६३ आणि ३५९ टक्के रुग्णवाढीची नोंद झाली. 

कर्नाटक आणि गुजरात या भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कर्नाटक तर आता कोरोनाची राजधानी म्हणून उदयाला येऊ लागले आहे. 

कर्नाटकात १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ४,२३४ एवढी होती. ती ३० एप्रिल रोजी ४८,२९६ एवढी झाली.

गुजरातमध्येही याच कालावधी ५०६ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. दिल्लीतही ९९१% रुग्णवाढ झाली आहे.

कोरोनाची बाधा झालेले तीन लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झाले. याच कालावधीत तीन हजार ६८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन लाख १५ हजार ५४२ झाली आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगाल