शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निवडणूक झालेल्या राज्यांत काेराेनाचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:46 IST

पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेशात जोमाने रुग्णवाढ

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात देशभरात कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड संख्येने वाढ झाली. १ एप्रिल रोजी देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार होता. तो ३० एप्रिल रोजी ४ लाख एवढा झाला. या सगळ्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णवाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ज्या राज्यांमध्ये निवडणूक होती त्या राज्यांत कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णवाढीचा सर्वाधिक वेग आसाममध्ये होता. 

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालसह आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली, तर उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांसाठी प्रचार झाला. या कालावधीत या सर्व राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जोमाने वाढल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. आसाममध्ये १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ५८ होती. ३० एप्रिल रोजी ही संख्या ३,१९७ एवढी झाली. याचाच अर्थ एकट्या आसामात एक महिन्यात तब्बल ५४१२ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. याच कालावधीत पश्चिम बंगालमध्ये १२६६ टक्के, केरळ आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे १२२९ आणि १२२७ टक्के, तर तामि‌ळनाडू आणि पुदुच्चेरीत अनुक्रमे ५६३ आणि ३५९ टक्के रुग्णवाढीची नोंद झाली. 

कर्नाटक आणि गुजरात या भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कर्नाटक तर आता कोरोनाची राजधानी म्हणून उदयाला येऊ लागले आहे. 

कर्नाटकात १ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांची संख्या अवघी ४,२३४ एवढी होती. ती ३० एप्रिल रोजी ४८,२९६ एवढी झाली.

गुजरातमध्येही याच कालावधी ५०६ टक्क्यांनी रुग्णवाढ नोंदविली गेली. दिल्लीतही ९९१% रुग्णवाढ झाली आहे.

कोरोनाची बाधा झालेले तीन लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झाले. याच कालावधीत तीन हजार ६८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन लाख १५ हजार ५४२ झाली आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्याwest bengalपश्चिम बंगाल