शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राज्यसभेतील निवृत्त सदस्यांना दिला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 03:46 IST

गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सतत तहकूब झाले नसते तर निवृर्त्तीपूर्वी अनेक सदस्यांना अभ्यासपूर्ण विचार सभागृहात मांडता आले असते

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सतत तहकूब झाले नसते तर निवृर्त्तीपूर्वी अनेक सदस्यांना अभ्यासपूर्ण विचार सभागृहात मांडता आले असते. काही मुद्दे त्यांच्या हातून निसटून गेले असतील. सभागृह चालले असते तर देशाला काही योगदान दिल्याचे समाधान त्यांना मिळाले असते. राज्यसभेचे २ वर्षांनी एक तृतियांश सदस्य निवृत्त होतात. ते निवृत्त झाले तरी त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. सभागृहाची दारे बंद झाली तरी संसद व पंतप्रधान कार्यालयाची दारे त्यांच्यासाठी खुली राहातील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केले.राज्यसभेतल्या ४0सदस्यांची मुदत मार्च-एप्रिलमध्ये संपत आहे. अखेरचे भाषण करताना काही सदस्य भावनाप्रधान झाले तर अनेकदा हास्याची कारंजीही उसळली. गदारोळाबद्दल बहुतांश ज्येष्ठ सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सभापती व्यंकय्या नायडूंनी निवृत्त सदस्यांना दिर्घायुरारोग्य लाभो व समाजजीवनात त्यांच्या हातून लोकसेवा घडो असे शुभचिंतन केले.अरुण जेटली म्हणाले की, अनेक महान संसदपटूंची भाषणे या सभागृहाने ऐकली. पक्षाचे संख्याबळ किती, यावर राज्यसभा सदस्यांचे पुनरागमन अवलंबून असते. मुदत संपल्यामुळे दोन प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकर व दिलीप तिर्की, अभिनेत्री रेखा सभागृहातून निवृत्त होत आहेत.महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले गेले तेव्हा मी लोकसभेची सदस्य होते. राज्यसभेत विधेयक मंजूरही झाले. अजूनही महिलांना न्याय मिळालेला नाही. मी लोकसभेत असताना १८ महिन्यांत ती बरखास्त झाली. राज्यसभेतही ५ वर्षांची अपुरी टर्मच वाट्याला आली. हा अपुराच योगच बहुदा माझ्या नशिबी असावा.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा