शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

व्होडाफोनच्या वक्तव्यावरून वादंग; सरकारने व्यक्त केली तीव्र नापसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:08 IST

व्होडाफोनचे सीईओ निक रिड यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला

संतोष ठाकूर नवी दिल्ली : व्होडाफोनचे सीईओ निक रिड यांच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असून, त्याबाबत सरकारने नापसंती व्यक्त केल्यानंतर निक रिड यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून माफी मागितल्याचे वृत्त आहे. बातम्यांमध्ये आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा खुलासा रिड यांनी केल्याचे समजते.सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसाद यांना पाठविलेल्या पत्रात रिड यांनी म्हटले आहे की, कंपनीसाठी भारत हा मोठा बाजार आहे. येथे मोठी गुंतवणूक केली आहे. यापुढेही भारतासोबतचे संबंध कंपनी कायम ठेवील.सदर प्रतिनिधीने कंपनीला संपर्क परंतु हे वृत्त लिहून होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. आयडिया-व्होडाफोनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणी कंपनीचे प्रमुख आदित्य बिर्ला यांच्या वतीने दूरसंचारमंत्री प्रसाद यांच्याशी थेट बोलणे होईल. कंपनीकडून कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केले जाणार नाही.रिड यांनी पत्रात लिहिले की, माध्यमांमध्ये आलेले आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दिले आहे. ते आमच्या विचारांचे प्रतिनिधत्व करीत नाही. त्याबद्दल आम्हाला खेद आहे. येत्या सप्ताहात आपण स्वत: भारत सरकारशी संपर्क करू. दूरसंचार क्षेत्राच्या वाईट स्थितीवर उपाय शोधण्यासाठी सचिवांचा समूह स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. हे एक गंभीर पाऊल आहे. यातून मदत पॅकेजबाबत काही तरी सकारात्मक निर्णय होईल, अशी आम्हाला आशा वाटते.>व्यावसायिक क्षेत्रात खळबळनिक रिड यांच्या हवाल्याने आलेल्या वृत्तात म्हटले होते की, ‘व्होडाफोन भारतातील व्यवसाय बंद करू शकते. यास सरकारची धोरणेही जबाबदार आहेत. रिड यांच्या या वक्तव्याने व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दूरसंचार मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेऊन आयडिया-व्होडाफोनकडून खुलासा मागविला होता. जिओच्या आगमनानंतर भारतीय दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा जीवघेणी झाली असून, तिचा सामना करण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांनी विलीनीकरण करून एकच कंपनी स्थापन केली आहे.

टॅग्स :Vodafoneव्होडाफोन