शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

"26/11 हल्ला पाक अन् यूपीए सरकारच्या संगनमतानंच, हिंदू दहशतवादी संकल्पना काँग्रेसचीच" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 11:33 IST

गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर. वी. एस मणी यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

नवी दिल्लीः गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर. वी. एस मणी यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मुंबईवरच्या ताज हॉटेलवर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तान आणि तत्कालीन यूपीए सरकारच्या संगनमतानं झाल्याचा गंभीर आरोप मणी यांनी केला आहे. कारण त्यावेळी केंद्रीय गृह मंत्रालयातील जास्त करून अधिकारी दहशतवादावर होणाऱ्या वार्षिक गृह सचिवस्तरावरच्या चर्चेसाठी इस्लामाबादला होते. ही चर्चा 25/11/2008ला पाकिस्तानमध्ये होणार होती, परंतु तिथे गेल्यानंतर ती तारीख वाढवून 26/11 करण्यात आली. त्यावेळी मला लखनऊला पाठवण्यात आलं होतं. त्याचदरम्यान मध्यरात्री हा हल्ला झाला.ते म्हणाले, हिंदू दहशतवाद ही एक जाणूनबुजून निर्माण करण्यात आलेली संकल्पना आहे. ही संकल्पना त्यावेळच्या केंद्र सरकारमधील काही मोठे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मिळून पसरवली होती. त्यानंतर त्याचे पुरावे शोधण्यात आले. केंद्र सरकारचा काय उद्देश होता ते माहीत नाही. पण त्यामुळे खरे दहशतवादी पळून गेले. मणी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीनं पुस्तक 'हिंदू टेरर- इनसायडर अकाउंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर'च्या प्रकाशनादरम्यान हे विधान केलं आहे. त्यांच्या पुस्तकातील भगवा दहशतवाद एक षडयंत्र यावर एक चर्चासत्र झालं. 

चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले की, मी काही राजकीय व्यक्ती नाही आणि पुस्तक प्रकाशनासाठी भोपाळला आलो आहे. याच दरम्यान 'द ग्रेट इंडियन कांस्पिरेसी' आणि  'आतंक से समझौता'चे लेखक आणि पत्रकार प्रवीण तिवारी यांनीही काँग्रेस नेत्यांवर हिंदू दहशतवाद संकल्पना रुजवण्याचा आरोप केला होता. मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या गळ्यात हिंदू धर्माचे लॉकेट घालण्यात आले होते, याची वाच्यता अमेरिकेनं पकडलेला दहशतवादी डेव्हिड हेडलीनं केली होती. जर कसाबला जिवंत पकडलं नसतं, तर सर्व दहशतवादी हिंदू घोषित करण्यात आले असते, हे एक षडयंत्र होतं, ते यशस्वी झालं नाही, असा आरोपही प्रवीण तिवारी यांनी केला आहे. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्ला