शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

वादग्रस्त आध्यात्मिक गुरू

By admin | Updated: November 19, 2014 00:00 IST

स्वामी सदाचारी- एकेकाळी आध्यात्मिक गुरू व तांत्रिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वामी सदाचारी यांना कुंटणखाना चालवण्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खावी लागली आहे.जयेंद्र सरस्वती- स्वामिगल कांची कामकोटी पीठाचे ६९वे शंकराचार्य असणारे स्वामी जयेंद्र सरस्वती यांना मंदिरातील कर्मचा-याच्या खुनाच्या आरोपावरून नोव्हेंबर २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.स्वामी परमहंस नित्यानंद - तामिळनाडूतील एक मोठे ...

स्वामी सदाचारी- एकेकाळी आध्यात्मिक गुरू व तांत्रिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वामी सदाचारी यांना कुंटणखाना चालवण्याच्या आरोपाखाली तुरूगांची हवा खावी लागली आहे.

जयेंद्र सरस्वती- स्वामिगल कांची कामकोटी पीठाचे ६९वे शंकराचार्य असणारे स्वामी जयेंद्र सरस्वती यांना मंदिरातील कर्मचा-याच्या खुनाच्या आरोपावरून नोव्हेंबर २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.

स्वामी परमहंस नित्यानंद - तामिळनाडूतील एक मोठे अध्यात्मिक गुरू असणा-या स्वामी नित्यानंद यांचे परदेशातही अनेक भक्त आहेत. संपूर्ण तामिळनाडू राज्यासह वाराणसी व पुरी येथे त्यांचे अनेक आश्रमही आहेत. अनेक भक्तांच्या आदर्शस्थानी असणा-या नित्यानंद यांची एका न्यूज चॅनेल सेक्स टेप प्रसारित केली होती. त्यानंतर ते वादाचा भोव-यात सापडले.

गुरमीत राम रहीम सिंग- डेरा सच्चा सौदाचे प्रमुख असणा-या बाबा गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. सिरसा येथील कार्यालयातील महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर असून एका खून प्रकरणातील सहभागाबाबतही त्यांची चौकशी सुरू आहे.

आसाराम बापू- आध्यात्मिक गुरू आसाराम बापू व त्यांच्या मुलाने आपले शोषण केल्याचा आरोप दोन बहिणींनी लावला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी त्यांना अटकही करण्यात आली होती तर त्यांचा मुलगा फरार झाला होता. मात्र अनेक महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले. तसेच त्यांच्या गुरूकुलातील दोन मुलांच्या मृत्यूप्रकरणीही त्यांच्यावर संशयाची सुई असून त्यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोप आसाराम यांच्यावर आहे.

नेमीचंद जैन उर्फ चंद्रास्वामी - नेमी चंद जैन उर्फ चंद्रास्वामी हा तथाकथित ज्योतिषी असून त्याच्यावर फेराअंतर्गत नऊ गुन्हे तसेच फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

प्रेमानंद तामिळनाडूतील तिरूचिरापल्ली आश्रमातील स्वामी प्रेमानंद यांना १३ महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. तसेच एका श्रीलंकन नागरिकाचा खून केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

संत रामपाल यांच्यावरील खुनाचा आरोप व अटक प्रकरणामुळे अध्यात्मिक गुरूंच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वादग्रस्त कृत्य अथवा वक्तव्यांमुळे देशातील अनेक गुरू अडचणीत सापडले असून अनेकांना तुरूंगाची हवा खावी लागली आहे. संत रामपाल यांच्या खुनाचा आरोप असून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. रामपाल यांना अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्या आश्रमात गेले असता हजारो भक्तांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांना अडवले. या धुमश्चक्रीत पोलिसांसह अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे.