शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संविध

By admin | Updated: December 27, 2014 18:54 IST

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी बौद्ध भिक्खूंचा पुढाकार

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी बौद्ध भिक्खूंचा पुढाकार

बुद्धनगरीत होणार भिक्खू संमेलन : देशभरातील बौद्ध भिक्खू होणार सहभागी
नागपूर :
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. संविधानात सर्व धर्मांना समान न्यायाची तरतूद आहे. परंतु अलीकडे धर्माच्या नावावर अल्पसंख्यक समुदायाला घाबरविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. हे देशासाठी घातक असून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा देशाला अखंड ठेवण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची काटेकोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे व्यक्त केले.
संविधानाच्या अंमलबजावणीसाठी बौद्ध भिक्खूंनी पुढाकार घेतला असून त्यासाठी नागपुरातील बुद्धनगरी येथे दोन दिवसीय राष्ट्रीय भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी पत्रपरिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना भदंत आनंद यांनी सांगितले की, अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समिती, वंदना संघ आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ जानेवारी रोजी नागपुरातील बुद्धनगरी येथे राष्ट्रीय भिक्खू संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय संविधानाने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा, धर्म उपासना, श्रद्धा यांच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचे षड्यंत्र सध्या देशात सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत. धर्मांतरविरोधी कायदा आणणे हा त्यातीलच एक प्रकार आहे. धर्मांतरविरोधी कायदा हा संविधानाचे उल्लंघन करण्याचाच प्रयत्न आहे. त्याला केंद्र सरकारकडूनही बळ मिळणे, हे एकूणच देशासाठी घातक आहे.
नागपुरात होणाऱ्या दोन दिवसीय संमेलनात देशभरातून भिक्खू सहभागी होतील. त्यात यावर सविस्तर चर्चा केली जाईल. तसेच देशभरातील बौद्धांच्या संघटनांची मोट बांधण्याचा यातून प्रयत्न केला जाईल. यानतर बौद्ध भिक्खू देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन संविधानाच्या अंमलबजवणीसाठी प्रचार प्रसार करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रपरिषदेला भदंत प्रज्ञाशील थेरो, भदंत सत्यानंद महाथेरो, भदंत धम्मनाग, भदंत हर्षबोधी, लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संचालक भय्याजी खैरकर, सचिन मून, प्रा. देवदास घोडेस्वार, एस.एस. चंद्रिकापुरे आदी उपस्थित होते.

बॉक्स...
महाबोधी महाविहार आंदोलनाची रूपरेषाही ठरणार
देशातील सर्वच धर्माचे पूजास्थळ, त्या-त्या धर्मीयांच्या हातात असून केवळ भारतीय बौद्धांसोबतच हा अन्याय सुरू आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील ऐतिहासिक भूमिका व वर्तमान सरकारसमोर आंदोलनाची रूपरेषाही या संमेलनात ठरविण्यात असल्याचे भदंत आनंद महास्थवीर यांनी सांगितले.