शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार करा - भारतीय लष्कर

By admin | Updated: September 19, 2016 13:36 IST

वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार केला पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. 
 
थेट युद्ध नाही पण पाकिस्तानला जरब बसेल अशी मर्यादीत स्वरुपाची कारवाई करावी असे भारतीय लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये  चालणा-या दहशतवादी तळांवर कारवाईचा करण्यासंबंधी सरकारने निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरुन पाकिस्तानला जरब बसेल असे अधिका-यांचे मत आहे. 
(VIDEO : उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद)
(भारताच्या बलुचिस्तानच्या भूमिकेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला?)
(हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे)
 
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. पाकिस्तानचा दारुगोळा भांडार तसेच त्यांच्या चौक्यांना यापूर्वी लक्ष्य केले आहे. त्याच रणनितीचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. पाकिस्तानकडूनही उत्तर मिळेल पण आपण त्याचा सामना करण्यास समर्थ आहोत असे लष्करातील सूत्रांचे म्हणणे आहे. 
 
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई करणे हा राजकीय निर्णय आहे. पण आता पुरे झाला हा संदेश पाकिस्तानला देण्यासाठी असा निर्णय घेणे आवश्यक आहे. २६/११ ते पठाणकोट आपण असे किती हल्ले सहन करणार आहोत ? आता ठोस प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे असे लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. 
 
 
काश्मीरमधील रात्रीची गस्त वाढवली
काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानातून सीमापार करुन काही दहशतवादी भारतात घुसले असण्याची शक्यता आहे. अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी लष्कराकडून मोठया प्रमाणावर शोध मोहिम सुरु असून, रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे. वायरलेस संदेशावरुन हे अतिरेकी तालिबानी, अलकायदा आणि इसिसशी संबंधित असू शकतात. पुढील हल्ले रोखण्यासाठी रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे.