शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार करा - भारतीय लष्कर

By admin | Updated: September 19, 2016 13:36 IST

वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार केला पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. 
 
थेट युद्ध नाही पण पाकिस्तानला जरब बसेल अशी मर्यादीत स्वरुपाची कारवाई करावी असे भारतीय लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये  चालणा-या दहशतवादी तळांवर कारवाईचा करण्यासंबंधी सरकारने निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरुन पाकिस्तानला जरब बसेल असे अधिका-यांचे मत आहे. 
(VIDEO : उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद)
(भारताच्या बलुचिस्तानच्या भूमिकेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला?)
(हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे)
 
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. पाकिस्तानचा दारुगोळा भांडार तसेच त्यांच्या चौक्यांना यापूर्वी लक्ष्य केले आहे. त्याच रणनितीचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. पाकिस्तानकडूनही उत्तर मिळेल पण आपण त्याचा सामना करण्यास समर्थ आहोत असे लष्करातील सूत्रांचे म्हणणे आहे. 
 
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई करणे हा राजकीय निर्णय आहे. पण आता पुरे झाला हा संदेश पाकिस्तानला देण्यासाठी असा निर्णय घेणे आवश्यक आहे. २६/११ ते पठाणकोट आपण असे किती हल्ले सहन करणार आहोत ? आता ठोस प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे असे लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. 
 
 
काश्मीरमधील रात्रीची गस्त वाढवली
काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानातून सीमापार करुन काही दहशतवादी भारतात घुसले असण्याची शक्यता आहे. अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी लष्कराकडून मोठया प्रमाणावर शोध मोहिम सुरु असून, रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे. वायरलेस संदेशावरुन हे अतिरेकी तालिबानी, अलकायदा आणि इसिसशी संबंधित असू शकतात. पुढील हल्ले रोखण्यासाठी रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे.