शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार करा - भारतीय लष्कर

By admin | Updated: September 19, 2016 13:36 IST

वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - वारंवार दहशतवादी कारवाया करणा-या पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने सीमेपलीकडच्या कारवाईचा विचार केला पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. 
 
थेट युद्ध नाही पण पाकिस्तानला जरब बसेल अशी मर्यादीत स्वरुपाची कारवाई करावी असे भारतीय लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये  चालणा-या दहशतवादी तळांवर कारवाईचा करण्यासंबंधी सरकारने निर्णय घेतला पाहिजे. जेणेकरुन पाकिस्तानला जरब बसेल असे अधिका-यांचे मत आहे. 
(VIDEO : उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील तीन जवान शहीद)
(भारताच्या बलुचिस्तानच्या भूमिकेमुळे पाकिस्तानचा दहशतवादी हल्ला?)
(हल्लेखोरांकडे पाकची शस्त्रास्त्रे)
 
उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ जवान शहीद झाल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे असे भारतीय लष्कराचे मत आहे. पाकिस्तानचा दारुगोळा भांडार तसेच त्यांच्या चौक्यांना यापूर्वी लक्ष्य केले आहे. त्याच रणनितीचा पुन्हा वापर करता येऊ शकतो. पाकिस्तानकडूनही उत्तर मिळेल पण आपण त्याचा सामना करण्यास समर्थ आहोत असे लष्करातील सूत्रांचे म्हणणे आहे. 
 
पाकिस्तानच्या हद्दीत घुसून कारवाई करणे हा राजकीय निर्णय आहे. पण आता पुरे झाला हा संदेश पाकिस्तानला देण्यासाठी असा निर्णय घेणे आवश्यक आहे. २६/११ ते पठाणकोट आपण असे किती हल्ले सहन करणार आहोत ? आता ठोस प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे असे लष्करातील काही अधिका-यांचे मत आहे. 
 
 
काश्मीरमधील रात्रीची गस्त वाढवली
काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानातून सीमापार करुन काही दहशतवादी भारतात घुसले असण्याची शक्यता आहे. अतिरेकी हल्ले रोखण्यासाठी लष्कराकडून मोठया प्रमाणावर शोध मोहिम सुरु असून, रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे. वायरलेस संदेशावरुन हे अतिरेकी तालिबानी, अलकायदा आणि इसिसशी संबंधित असू शकतात. पुढील हल्ले रोखण्यासाठी रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यात आली आहे.