शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेमुळे भाजपा सापडला खिंडीत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 04:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून जी भीषण स्थिती निर्माण केली ती काँग्रेसला सुधारायची आहे. त्यासाठीच गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करण्याची न्याय योजना आम्ही जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून जी भीषण स्थिती निर्माण केली ती काँग्रेसला सुधारायची आहे. त्यासाठीच गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करण्याची न्याय योजना आम्ही जाहीर केली आहे. गरिबी हटविण्यासाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय योजनेमुळे भाजपा पुरता खिंडीत सापडला आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले, देशातील गरिबातील गरीब२० टक्के कुटुंबांना मदत पुरविणेव नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढणेही न्याय योजनेची प्रमुख दोन उद्दिष्टे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी, अंमलात आणलेला गब्बरसिंग टॅक्स म्हणजेच जीएसटी यामुळे देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. असंघटित क्षेत्राला या निर्णयांचा मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी गरिबांनाच लुबाडण्याचे काम केले आहे. त्यांना दिले मात्र काहीही नाही. मोदी यांनी देशातील शेतकरी, लघू व मध्यम उद्योजक यांचे कंबरडे मोडले असून आयाबहिणींच्या बचतीवरही डल्ला मारला आहे.राहुल गांधी म्हणाले की, न्याय योजना हा गरिबीवर केलेला अंतिम प्रहार असेल. ३.६ लाख कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होऊ शकते हे काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत पटणारे नाही. न्याय योजनेचा आराखडा तयार करण्याआधी अनेक अर्थतज्ज्ञांशी काँग्रेसने सल्लासमलत केली होती. खात्री पटल्यानंतरच या योजनेचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्याचा विचार पक्का झाला. ही लोकानुनयी योजना नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.फक्त उद्योगपतींनाच फायदाराहुल गांधी यांनी सांगितले की, मोदींच्या राजवटीत फक्त त्यांच्या उद्योगपती मित्रांचाच फायदा झाला आहे. काँग्रेस मात्र या देशातील गरिबांच्या कल्याणाची भाषा करत आहे. त्यासाठीच न्याय योजनेची आखणी केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास न्याय योजनेची देशभरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. सर्व लाभार्थी कुटुंबांना या योजनेत सामावून घेतले जाईल. जीएसटीचा जसा बोजवारा उडाला तसे न्याय योजनेचे होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल. तिच्या अंमलबजावणीतील त्रुटी वेळीच दूर करण्यात येतील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक