शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेमुळे भाजपा सापडला खिंडीत - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 04:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून जी भीषण स्थिती निर्माण केली ती काँग्रेसला सुधारायची आहे. त्यासाठीच गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करण्याची न्याय योजना आम्ही जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करून जी भीषण स्थिती निर्माण केली ती काँग्रेसला सुधारायची आहे. त्यासाठीच गरिबांच्या खात्यात वर्षाला ७२ हजार रुपये जमा करण्याची न्याय योजना आम्ही जाहीर केली आहे. गरिबी हटविण्यासाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय योजनेमुळे भाजपा पुरता खिंडीत सापडला आहे, असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केला.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी म्हणाले, देशातील गरिबातील गरीब२० टक्के कुटुंबांना मदत पुरविणेव नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीतून अर्थव्यवस्थेला बाहेर काढणेही न्याय योजनेची प्रमुख दोन उद्दिष्टे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी, अंमलात आणलेला गब्बरसिंग टॅक्स म्हणजेच जीएसटी यामुळे देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. असंघटित क्षेत्राला या निर्णयांचा मोठा फटका बसला आहे. गेल्या पाच वर्षांत मोदींनी गरिबांनाच लुबाडण्याचे काम केले आहे. त्यांना दिले मात्र काहीही नाही. मोदी यांनी देशातील शेतकरी, लघू व मध्यम उद्योजक यांचे कंबरडे मोडले असून आयाबहिणींच्या बचतीवरही डल्ला मारला आहे.राहुल गांधी म्हणाले की, न्याय योजना हा गरिबीवर केलेला अंतिम प्रहार असेल. ३.६ लाख कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होऊ शकते हे काही अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत पटणारे नाही. न्याय योजनेचा आराखडा तयार करण्याआधी अनेक अर्थतज्ज्ञांशी काँग्रेसने सल्लासमलत केली होती. खात्री पटल्यानंतरच या योजनेचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये समावेश करण्याचा विचार पक्का झाला. ही लोकानुनयी योजना नसल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.फक्त उद्योगपतींनाच फायदाराहुल गांधी यांनी सांगितले की, मोदींच्या राजवटीत फक्त त्यांच्या उद्योगपती मित्रांचाच फायदा झाला आहे. काँग्रेस मात्र या देशातील गरिबांच्या कल्याणाची भाषा करत आहे. त्यासाठीच न्याय योजनेची आखणी केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास न्याय योजनेची देशभरात टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येईल. सर्व लाभार्थी कुटुंबांना या योजनेत सामावून घेतले जाईल. जीएसटीचा जसा बोजवारा उडाला तसे न्याय योजनेचे होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाईल. तिच्या अंमलबजावणीतील त्रुटी वेळीच दूर करण्यात येतील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक