शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

इशरत, मालेगाव मुद्द्यांवर काँग्रेस होणार आक्रमक

By admin | Updated: June 30, 2016 05:27 IST

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्यामुळे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- इशरत जहाँ चकमक प्रकरण आणि मालेगाव स्फोटाच्या मुद्यावर सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्यामुळे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत मिळाले आहेत. इशरतप्रकरणी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या सुधारित प्रतिज्ञापत्राचा वाद उफाळल्यानंतर मोदी सरकारने बी.के. प्रसाद यांच्या नेतृत्वात या प्रकरणाचा तपास केला असता तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आरोपमुक्त करण्यात आल्याची ठोस माहिती काँग्रेसला अहवालाच्या आधारे मिळाली आहे. चिदंबरम यांनीच प्रतिज्ञापत्रात बदल घडवून आणल्याचा आरोप भाजपने चालविला होता. काँग्रेसने आता हा अहवाल जाहीर करण्याची मागणी लावून धरली आहे. सरकार खोटे आरोप करीत असून ते सिद्ध न करताच पळ काढत असल्याचा आरोप करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी.पी. जोशी आणि शोभा ओझा यांनी या मुद्याला हवा दिली आहे. काँग्रेसने बुधवारी मालेगाव स्फोटाच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले. मुंबईच्या न्यायालयाने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.