शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काँग्रेसकडून स्वागत संतोष पाटील: राजकारण न करता शेतकर्‍यांना जगवा

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

सोलापूर :

सोलापूर :
एनटीपीसीच्या पाईपलाईनमधून सोलापूरला पाणी देऊन बचत केलेले 20 टीएमसी पाणी ग्रामीण भागाला देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी स्वागत केले आहे. दुष्काळ निवारणासाठी आम्ही सरकारसोबत असून, राजकारण न करता शेतकर्‍यांना जगवा, ही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकरी अडचणीत आला. आहे ते पैसे खचरून, प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून हजारो फूट बोअरवर खर्च करून, आहे ती शेती जगविण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा प्रशासनाला हा दुष्काळ दिसलाच नाही. त्यामुळे दोन महिने आम्ही रस्त्यावर उतरलो. रस्ता रोको, मोर्चा यातून दुष्काळाची ही दाहकता सरकारपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ हे नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजकारण न करता आम्हीही सरकारबरोबर आहोत. शेतकर्‍यांचे कर्ज माफ व्हावे, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी, वीज बिल माफ करावे, पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सोडवावा, ही मागणी लावून धरली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सोलापूर जिल्हा दौरा केल्यावर दुष्काळाची दाहकता त्यांना जाणवली. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री सकारात्मक झाले, आता जिल्हा प्रशासनानेही लालफितीचा कारभार बाजूला ठेवून पीक पंचनामे द्यावेत व भेदरलेल्या शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे, आता शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
इन्फो..
शिंदे यांची दूरदृष्टी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एनटीपीसीचा प्रकल्प सोलापुरात आणला. आता या प्रकल्पाची पाईपलाईन डिसेंबरपर्यंत पूर्ण करून सोलापूरकरांची तहान भागवू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे शक्य झाले ते शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळेच. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. आलम?ीचे पाणी आणण्याचा फडणवीस सरकारने प्रस्ताव दिला तर आम्ही प्रयत्न करू, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील म्हणाले.