मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काँग्रेसकडून स्वागत संतोष पाटील: राजकारण न करता शेतकर्यांना जगवा
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
सोलापूर :
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काँग्रेसकडून स्वागत संतोष पाटील: राजकारण न करता शेतकर्यांना जगवा
सोलापूर : एनटीपीसीच्या पाईपलाईनमधून सोलापूरला पाणी देऊन बचत केलेले 20 टीएमसी पाणी ग्रामीण भागाला देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी स्वागत केले आहे. दुष्काळ निवारणासाठी आम्ही सरकारसोबत असून, राजकारण न करता शेतकर्यांना जगवा, ही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकरी अडचणीत आला. आहे ते पैसे खचरून, प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून हजारो फूट बोअरवर खर्च करून, आहे ती शेती जगविण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा प्रशासनाला हा दुष्काळ दिसलाच नाही. त्यामुळे दोन महिने आम्ही रस्त्यावर उतरलो. रस्ता रोको, मोर्चा यातून दुष्काळाची ही दाहकता सरकारपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ हे नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजकारण न करता आम्हीही सरकारबरोबर आहोत. शेतकर्यांचे कर्ज माफ व्हावे, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी, वीज बिल माफ करावे, पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्याचा प्रश्न सोडवावा, ही मागणी लावून धरली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सोलापूर जिल्हा दौरा केल्यावर दुष्काळाची दाहकता त्यांना जाणवली. शेतकर्यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री सकारात्मक झाले, आता जिल्हा प्रशासनानेही लालफितीचा कारभार बाजूला ठेवून पीक पंचनामे द्यावेत व भेदरलेल्या शेतकर्यांना दिलासा द्यावा. विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे, आता शेतकर्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. इन्फो..शिंदे यांची दूरदृष्टीमाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एनटीपीसीचा प्रकल्प सोलापुरात आणला. आता या प्रकल्पाची पाईपलाईन डिसेंबरपर्यंत पूर्ण करून सोलापूरकरांची तहान भागवू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे शक्य झाले ते शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळेच. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. आलम?ीचे पाणी आणण्याचा फडणवीस सरकारने प्रस्ताव दिला तर आम्ही प्रयत्न करू, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील म्हणाले.