शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कधीही पाकिस्तानात गेलो नाही, हे माझं भाग्य: गुलाम नबी आझाद

By देवेश फडके | Updated: February 9, 2021 13:56 IST

गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील  कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देगुलाम नबी आझाद यांच्यासह चौघांना राज्यसभेतून निरोपनिरोपावेळी गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केल्या भावनाभारतीय मुसलमान असल्याचा अभिमान असल्याचे केले नमूद

नवी दिल्ली : आम्ही त्या नशीबवान लोकांपैकी एक आहोत, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील  कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. त्यावेळी निरोपाच्या भाषणावेळी ते बोलत होते. (congress senior leader ghulam nabi azad shared experience in rajya sabha at farewell) 

गुलाम नबी आझाद यांनी निरोपाच्या भाषणावेळी सांगितले की, आम्ही त्या नशीबवान लोकांपैकी आहोत, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. पाकिस्तानातील परिस्थिती पाहिली की, भारतीय मुसलमान असल्याचा मला अभिमान वाटतो. एवढेच नव्हे, तर मी असे म्हणेन की, जगात जर कोणत्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा, असे आझाद यांनी नमूद केले. 

गेल्या ३० ते ३५ वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत आपण पाहतोय की, मुस्लिम एकमेकांशी लढत संपत चालले आहेत. तिथे तर हिंदूही नाहीत, ख्रिश्चनही नाहीत, दुसरे कुणी लढत नाहीत. ते आपसातच लढत आहेत, असेही ते म्हणाले. 

"भारतरत्नांच्या चौकशीचे आदेश मागे घ्या, अन्...", राम कदमांचे गृहमंत्र्यांना पत्र

जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा पहिली बैठक सोपोरमध्ये घेतली होती. गिलानी दोन ते तीन वेळा या भागातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत मी म्हणालो होतो की, माझ्या सरकारमधील कोणताही मंत्री धर्म वा मशिद किंवा पक्षाच्या आधारावर न्यायनिवाडा करेल, तर मला लाज वाटेल की, मी या मंत्र्यासोबत काम करतोय, असे आझाद यांनी सांगितले. दरम्यान, १५ फेब्रुवारी २०२१ रोजी गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर तीन खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण