शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

काँग्रेसमध्ये राहुलपर्व, पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, मोदी व भाजपावर कडाडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:58 IST

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. या समारंभाला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सर्व राज्यांमधील महत्त्वाचे सारे नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती.राहुल गांधी यांनी या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपावर हल्ला करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशाला २१व्या शतकात नेले; मात्र, आमचे पंतप्रधान आम्हाला मध्ययुगाकडे नेत आहेत. देशात दडपशाही, मारहाण केली जाते. लोकांना मारून टाकले जात आहे. कोणी काय खायचे, कोणी काय परिधान करायचे, हेही सत्ताधारी ठरवत आहेत.हा हिंसाचार लज्जास्पद आहे, अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होत आहे. या सरकारने देशाचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.राहुल गांधी यांनीपदभार स्वीकारलाराहुल गांधी यांनी वयाच्या ४७व्या वर्षी १३२ वर्षे जुन्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने त्यांना ते निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. या वेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते.मान्यवरांकडून शुभेच्छाकाँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलराहुल गांधी यांना द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, अभिनेते कमल हासन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या मोठ्या जबाबदारीसाठी व आपल्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा.१९७१च्या युद्धातीलशहिदांना आदरांजलीकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय दिवसाच्या निमित्ताने १९७१च्या युद्धातील भारतीय शहिदांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी ट्विट केले की, १९७१च्या युद्धातील शहिदांच्या साहस आणि बलिदानाला सलाम. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले त्या शूरवीरांची आठवण करू या. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. या युद्धानंतर बांगलादेशाची स्थापना झाली होती.ते संपवण्याची भाषा करतात,आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो!भाजपाचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, गत काही वर्षांत काँग्रेसला कमजोर करण्यासाठी हल्ले केले जात आहेत. ते आम्हाला पराभूत करू शकतात. मात्र, आमचा आवाज दाबू शकत नाहीत. ते जेवढा द्वेष, राग दाखवतील तेवढेच आम्ही मजबूत होऊ. भाजपा स्वत:साठी लढत आहे; तर, काँग्रेस देशातील प्रत्येक बहीण-भावासाठी लढत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी