शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काँग्रेसमध्ये राहुलपर्व, पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, मोदी व भाजपावर कडाडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:58 IST

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. या समारंभाला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सर्व राज्यांमधील महत्त्वाचे सारे नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती.राहुल गांधी यांनी या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपावर हल्ला करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशाला २१व्या शतकात नेले; मात्र, आमचे पंतप्रधान आम्हाला मध्ययुगाकडे नेत आहेत. देशात दडपशाही, मारहाण केली जाते. लोकांना मारून टाकले जात आहे. कोणी काय खायचे, कोणी काय परिधान करायचे, हेही सत्ताधारी ठरवत आहेत.हा हिंसाचार लज्जास्पद आहे, अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होत आहे. या सरकारने देशाचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.राहुल गांधी यांनीपदभार स्वीकारलाराहुल गांधी यांनी वयाच्या ४७व्या वर्षी १३२ वर्षे जुन्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने त्यांना ते निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. या वेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते.मान्यवरांकडून शुभेच्छाकाँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलराहुल गांधी यांना द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, अभिनेते कमल हासन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या मोठ्या जबाबदारीसाठी व आपल्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा.१९७१च्या युद्धातीलशहिदांना आदरांजलीकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय दिवसाच्या निमित्ताने १९७१च्या युद्धातील भारतीय शहिदांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी ट्विट केले की, १९७१च्या युद्धातील शहिदांच्या साहस आणि बलिदानाला सलाम. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले त्या शूरवीरांची आठवण करू या. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. या युद्धानंतर बांगलादेशाची स्थापना झाली होती.ते संपवण्याची भाषा करतात,आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो!भाजपाचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, गत काही वर्षांत काँग्रेसला कमजोर करण्यासाठी हल्ले केले जात आहेत. ते आम्हाला पराभूत करू शकतात. मात्र, आमचा आवाज दाबू शकत नाहीत. ते जेवढा द्वेष, राग दाखवतील तेवढेच आम्ही मजबूत होऊ. भाजपा स्वत:साठी लढत आहे; तर, काँग्रेस देशातील प्रत्येक बहीण-भावासाठी लढत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी