शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये राहुलपर्व, पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, मोदी व भाजपावर कडाडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 05:58 IST

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताच राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे सरकार व भाजपावर कडाडून हल्ला चढवला. मुख्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. या समारंभाला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सर्व राज्यांमधील महत्त्वाचे सारे नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती.राहुल गांधी यांनी या वेळी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात तरुणांना द्वेषाच्या राजकारणाला पराभूत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. भाजपावर हल्ला करताना ते म्हणाले, काँग्रेसने देशाला २१व्या शतकात नेले; मात्र, आमचे पंतप्रधान आम्हाला मध्ययुगाकडे नेत आहेत. देशात दडपशाही, मारहाण केली जाते. लोकांना मारून टाकले जात आहे. कोणी काय खायचे, कोणी काय परिधान करायचे, हेही सत्ताधारी ठरवत आहेत.हा हिंसाचार लज्जास्पद आहे, अशा घटनांमुळे देशाची प्रतिमा जगात मलिन होत आहे. या सरकारने देशाचे जे नुकसान केले आहे त्याची भरपाई करणे कठीण आहे, असेही ते म्हणाले.राहुल गांधी यांनीपदभार स्वीकारलाराहुल गांधी यांनी वयाच्या ४७व्या वर्षी १३२ वर्षे जुन्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला, तेव्हा पक्षाच्या निवडणूक प्राधिकरणाने त्यांना ते निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिले. या वेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते.मान्यवरांकडून शुभेच्छाकाँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलराहुल गांधी यांना द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, अभिनेते कमल हासन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या. केजरीवाल यांनी ट्विट केले आहे की, या मोठ्या जबाबदारीसाठी व आपल्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा.१९७१च्या युद्धातीलशहिदांना आदरांजलीकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय दिवसाच्या निमित्ताने १९७१च्या युद्धातील भारतीय शहिदांना आदरांजली अर्पण केली. त्यांनी ट्विट केले की, १९७१च्या युद्धातील शहिदांच्या साहस आणि बलिदानाला सलाम. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले त्या शूरवीरांची आठवण करू या. या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. या युद्धानंतर बांगलादेशाची स्थापना झाली होती.ते संपवण्याची भाषा करतात,आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो!भाजपाचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले, गत काही वर्षांत काँग्रेसला कमजोर करण्यासाठी हल्ले केले जात आहेत. ते आम्हाला पराभूत करू शकतात. मात्र, आमचा आवाज दाबू शकत नाहीत. ते जेवढा द्वेष, राग दाखवतील तेवढेच आम्ही मजबूत होऊ. भाजपा स्वत:साठी लढत आहे; तर, काँग्रेस देशातील प्रत्येक बहीण-भावासाठी लढत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी