शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

“राहुल गांधी भाजपसाठी सर्वात मोठा TRP, विरोधकांचा चेहरा बनले तर..,” ममता बॅनर्जींचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 08:20 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून जोरदार टीका केली आणि भाजपवरही हल्लाबोल केला. “भाजपला राहुल गांधींना नेता बनवायचं आहे, म्हणूनच संसद चालू देत नाही. जर राहुल गांधी विरोधकांचा चेहरा असतील तर मोदींना कोणीही वाईट म्हणू शकणार नाही. राहुल गांधी हे स्वतः मोदींचे मोठे... फार काही बोलणार नाही, पण तुम्ही समजू शकता,” असं म्हणत त्यांनी टीकेचा बाण सोडला.

ममता बॅनर्जी यांनी रविवारी मुर्शिदाबाद जिल्ह्यात टीएमसी कार्यकर्त्यांना फोनवरून संबोधित केलं. राहुल गांधींचं नाव घेत ममता बॅनर्जी यांनी भाजपवरही निशाणा साधला. “भाजपला संसद चालवायची नाही. कारण त्यांना राहुल गांधींना नेता बनवायचं आहे. राहुल गांधीच नेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणी वाईट म्हणणार नाही. नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा टीआरपी राहुल गांधी आहेत. नाहीतर, परदेशात कोणी काही बोलले, इथे गदारोळ होतो असं कधी पाहिलंय का?” असा सवाल त्यांनी केला आहे. 

“संसदेतील कामकाज सुरू राहावं आणि अदानी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे. एलआयसीवर चर्चा व्हायला हवी. अदानींबाबत चर्चा का होत नाही. एलआयसीवर चर्चा का होत नाही. गॅसच्या किमतीबाबत चर्चा का केल्या जात नाहीत. याचदरम्यान, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू कॉपी सादर करण्यात आली आहे. आम्ही ते नाही मानत. त्याची अंमलबजावणी आम्ही होऊ देणार नाही,” असंही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

“विरोधकांचा बिग बॉस समजू नये”दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर टीएमसीनं काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बॅनर्जी म्हणाले की, काँग्रेसनं विरोधकांचा बिग बॉस आहे असं समजू नये. “बैठकीत प्रादेशिक पक्षांना भाजपविरोधात एकत्र आणण्याबाबत आणि काँग्रेसपासून समान अंतर ठेवण्याबाबत चर्चा झाली. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर टीएमसी पूर्ण ताकदीनं पुढे जाईल. काँग्रेस काय करत आहे हे कळत नाही, पण बंगालमध्ये काँग्रेस, भाजप आणि सीपीएम एकत्र आहेत आणि ममता सरकारला समस्या निर्माण करत आहेत. एकत्र येण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांशी चर्चा करू,” असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी