शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

काँग्रेस म्हणजे एका कुटुंबाची खासगी संपत्ती, चिदंबरम यांचा टोला

By admin | Updated: March 7, 2017 13:35 IST

काँग्रेसवर बोलताना देशातील एका राजकीय पक्षासाठी अजूनही खूप संधी असल्याचंही ते बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 7 - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमने काँग्रेस पक्ष कौटुंबिक संपत्ती झाल्याची टीका केली आहे. काँग्रेसवर बोलताना देशातील एका राजकीय पक्षासाठी अजूनही खूप संधी असल्याचंही ते बोलले आहेत. अनेक पक्षांमध्ये कौटुंबिक वर्चस्व निर्माण झालं असून, नवीन पीढीच्या नेत्यांसाठी त्यांनी दरवाजे बंद केले असल्याचं कार्ती चिदंबरम बोलले आहेत. जनरेशन 67 संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना कार्ती चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं. 
 
'काँग्रेससहित अनेक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष कुटुंबाची खासगी संपत्ती झाली आहे, आणि यांच्यामध्ये काही सुधारणा होईल असं वाटत नाही. अशा परिस्थितीत जर कोणी नवीन व्यक्ती राजकरणात येण्याचा प्रयत्न करत असेल तर या सिस्टममध्ये तो फिट बसणार नाही. कारण यासाठी त्याला पक्षप्रमुख किंवा दुस-या नेत्यांची खुमात करत बसावी लागेल', असं कार्ती चिदंबरम बोलले आहेत.
 
कार्ती चिदंबरम पुढे म्हणालेत की, 'कोणत्याही राजकीय पक्षाने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई किंवा एखाद्या IIT टॉपरला निवडणूक लढण्यासाठी आमंत्रण दिलं का ? मग तो काँग्रेस असो किंवा भाजपा, डीएमके आणि अण्णाद्रुमूक. सर्व पक्ष एखाज्या कुटुंबाकडून चालवले जात असून कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळण्याची काही शक्यताच नाही'.